Jaya Bachchan : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन त्यांच्या व्यक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी देखील त्या अर्थसंकल्पावर केलेल्या एका व्यक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांना अर्थसंकल्पावर केलेल्या त्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सामना करावा लागत आहे. अर्थसंकल्पावर नेमक्या काय बोलल्या जया बच्चन? का करावा लागत आहे ट्रोलिंगचा समना? वाचा
काल 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘बजेट 2024’ सादर केला होता. या अर्थसंकल्पाबाबत जया यांनी दिलेला प्रतिसाद लोकांना अजिबात आवडलेला नाही.
एएनआयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जया बच्चन यांना संसदेबाहेर 2024 च्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर जया बच्चन म्हणताना दिसत आहे, ‘माझी कोणतीही प्रतिक्रिया नाही, प्रतिक्रिया देणारा हा अर्थसंकल्प आहे का? हे फक्त नाटक आहे. कागदावर दिलेली आश्वासने कधीच पूर्ण होणार नाहीत.’
https://www.instagram.com/reel/C9y3lSxCfVo/?utm_source=ig_web_copy_link
जया बच्चन यांच्या या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘तुमच्या प्रतिक्रियेची गरज नाही’. तर दुसऱ्याने लिहिले की, ‘हे नाटक करण्यासाठी त्या राजकारणात आल्या आहेत का हे मला समजले नाही. अशाच अनेक कमेंट जया बच्चन यांच्या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.
जया बच्चन ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांना अनेकदा त्यांच्या अशाच काहीशा वक्त्यव्यामुळे ट्रोलिंग समाना करावा लागला आहे.