परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला माहिती दिली की बांगलादेश मधील हिंसाचारादरम्यान आम्ही अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. त्यांचे संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी विविध गट आणि संघटनांनी पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे. साहजिकच कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत होईपर्यंत आम्ही चिंतेत असू असे ते म्हणाले आहेत. मात्र केंद्र सरकारचे बांगलादेशच्या परिस्थितीवर बारीक लक्ष आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच बांगलादेशात भारताचे 10 हजार विद्यार्थी अडकले असून त्यांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशच्या सैन्यासोबत भारत सरकार सातत्याने संपर्क साधत आहे असेही जयशंकर यांनी सांगितले.
शेख हसीना काल संध्याकाळी नवी दिल्लीत आल्या होत्या आणि भारताला बांगलादेशकडून विमान मंजुरीसाठी विनंती प्राप्त झाली होती.शेख हसीना यांना भविष्यात काय करायचे आहे याचा निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ हवा असून तोपर्यंत भारत त्यांना सर्वतोपरी मदत करेल असे जयशंकर यांनी सांगितले.
बांगलादेशातील परिस्थितीवर राज्यसभेत बोलताना जयशंकर म्हणाले, “आम्ही आमच्या राजनैतिक मिशनद्वारे बांगलादेशातील भारतीय समुदायाशी जवळच्या आणि सतत संपर्कात आहोत. तेथे अंदाजे 19,000 भारतीय नागरिक आहेत ज्यापैकी सुमारे 9000 विद्यार्थी आहेत.
जयशंकर यांनी नमूद केले की भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अत्यंत घनिष्ठ आहेत.आंदोलनांची सुरवात झाल्यापासून बांगलादेशला आम्ही संयम राखण्याचा सल्ला दिला आणि चर्चेने परिस्थिती सोडवण्याचे आवाहन केले, असे जयशंकर यांनी राज्यसभेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जयशंकर पुढे म्हणाले की वाढत्या हिंसाचारात सार्वजनिक इमारती आणि पायाभूत सुविधांवर हल्ले तसेच वाहतूक आणि रेल्वे अडथळे यांचा समावेश आहे. 21 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल असूनही, आंदोलने थांबली नाहीत, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
“त्यानंतर घेतलेल्या विविध निर्णय आणि कृतींमुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. या टप्प्यावरची आंदोलने एका पॉइंट अजेंड्यावर एकत्र आली, ती म्हणजे पंतप्रधान शेख हसीना यांनी पायउतार व्हावे,” .त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी शेजारील देशातील परिस्थिती गंभीर झाल्याची माहिती जयशंकर यांनी राज्यसभेत दिली.
“पोलिस स्टेशन आणि सरकारी प्रतिष्ठानांसह पोलिसांवरील हल्ले, एकूणच हिंसाचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले . . राजवटीशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तेची देशभरात जाळपोळ करण्यात आली. विशेष म्हणजे चिंतेची बाब म्हणजे अल्पसंख्याक, त्यांचे व्यवसाय आणि मंदिरेही या हल्ल्याच्या कक्षेत आली. अनेक ठिकाणी हल्ले झाले याची संपूर्ण माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही,” जयशंकर म्हणाले
“लष्कर प्रमुख, जनरल वकेर-उझ-झमान यांनी 5 ऑगस्ट रोजी राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी जबाबदारी स्वीकारणे आणि अंतरिम सरकार स्थापन करण्याबद्दल सांगितले आहे. आता आम्ही बांगलादेशात शांतता आणि सुव्यवस्था स्थापित होण्यासाठी वाट बघत आहोत.