आप पक्षाचे नेते अरविंद केजरिवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. एक केजरीवाल यांना झालेली अटक बेकायदेशीर आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. तर दुसरी याचिका अंतरिम जामीनासाठी दाखल केली आहे.
आज पार पडलेल्या सुनावणीत सीबीआयने केजरीवाल यांनी त्यांची अटक बेकायदेशीर आहे, असा दावा केला आहे त्यावर आम्ही उत्तर सादर केले आहे मात्र, अंतरिम जामिनावर आम्ही उत्तर सादर केलेले नाही. ते लवकरच सादर करू, असं म्हणत वेळ मागितला होता.
यावर केजरिवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी विरोध केला. मात्र, न्यायालयाने या सर्व प्रकरणावर ५ सप्टेंबरला सुनावणी घेऊ असे सांगत आज होणारी सुनावणी पुढे ढकलली आहे…
तथापी, अबकारी घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 27 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला होता मात्र . सीबीआय आणखी एका वेगळ्या प्रकरणात त्यांची चौकशी करत असल्यामुळे त्यामुळे जामीन मिळाला असला तरी अरविंद केजरीवाल यांचा मुक्काम दुसऱ्याही प्रकरणात जामीन मिळेपर्यंत तुरुंगातच राहणार आहे.