इस्रायल (Israel) आणि हिज्बुल्लाह (Hezbollah) यांच्यात सध्या चालू असलेल्या गंभीर संघर्षामुळे लेबनॉनच्या सीमेवर परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे. या युद्धात दोन्ही बाजूंनी रॉकेट आणि मिसाइल्सचा वापर सुरू आहे, आणि या भागात मोठ्या प्रमाणात बॉम्बचा देखील वापर केला जात आहे. या कठीण परिस्थितीत, इस्रायलने आपल्या हल्ल्यांच्या माध्यमातून हिज्बुल्लाहच्या काही दहशतवादी सदस्यांना टार्गेट केले आहे. या संघर्षामुळे दक्षिण लेबनानमध्ये सुमारे 120 किलोमीटर लांबीची जी सीमा आहे ज्याला ब्लू लाइन म्हणतात तिथे अशांतता पसरली आहे.
या परिस्थितीत, भारताचे 600 जवान युनायटेड नेशन्सच्या इंटरिम फोर्स (UNIFIL) अंतर्गत तैनात करण्यात आले आहेत. भारतीय जवानांचा मुख्य उद्देश म्हणजे ब्लू लाइनवर शांतता राखणे, जेणेकरून दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण होईल आणि संघर्षाची परिस्थिती देखील कमी होईल. UNIFIL ची स्थापना 2000 मध्ये करण्यात आली होती, ज्यामुळे या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय जवान या शांती मिशनमध्ये दीर्घकाळ तैनात आहेत, आणि ते इतर देशांच्या जवानांबरोबर काम करत आहेत.
भारतीय सरकार आणि सैन्य येथील परिस्थितीवर बारीक लक्ष आणि बारीक नजर ठेवून आहेत. भारतीय जवानांच्या उपस्थितीमुळे, या क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणे शक्य होत आहे, कारण या संघर्षाचा थेट परिणाम भारतीय सुरक्षा धोरणांवर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत, ब्लू लाइनवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. या भागातील परिस्थिती बिकट होत चालली असल्यामुळे, याठिकाणी शांतता निर्माण करणे अतिशय कठीण झाले आहे. दरम्यान, इस्रायल आणि लेबनान यांच्यातील तणावाच्या वातावरणामुळे या जवानांना धोका देखील आहे तरीही ते आपल्या मिशनवर ठाम राहून काम करत आहेत.
भारतीय जवानांना तैनात करून, भारत नेहमीच आंतरराष्ट्रीय शांतीसाठी कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर, या संपूर्ण परिस्थितीवर सर्वच जागतिक समुदायाचे लक्ष आहे, कारण यामुळे विविध भौगोलिक आणि राजकीय परिस्थितींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.