Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोंदिया-भंडारा (Bhandara-Gondia) जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 25 हजार रुपये बोनस मिळवून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
रविवारी ते (ता.१३) गोंदिया येथे धापेवाडा योजनेच्या टप्पा २ व ३ चे भुमिपूजन आणि दुरुस्त झालेल्या वितरिकेचे लोकार्पण सोहळ्यावेळी बोलत होते. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीवर देखील जोरदार निशाना साधला. फडणवीस म्हणाले, मविआ सरकारच्या काळात धानाला बोनस घोषित करण्यात आले. मात्र ते शेतकऱ्यांच्या पदरात पडलेच नाही. पण आमचे सरकार आले आणि आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिले. याआधी धानाच्या बोनसची केवळ आश्वासणे दिली गेली. पण आम्ही शेतकर्यांना आधी १५ हजार नंतर २० हजार धानाला बोनस दिला. आता तिरोड्यातील शेतकर्यांची मागणी धानास २५ हजार बोनस देण्याची होत आहे. ती देखील आम्ही लवकरच मान्य करू असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले आहे आहे.
दरम्यान, राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्ववभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच महाराष्ट्र्रात अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमातून सर्वसामान्यांसाठी अनेक घोषणा केल्या जात आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात येत आहेत.