राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच (4 फेब्रुवारी 2025) पार पडली आहे. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
आज पार पडलेल्या बैठकीत महसूल, जलसंपदा आणि मृद व जलसंधारण विभागांशी संबंधित तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, अभय योजनेला एक वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे :-
-पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील टेमघर प्रकल्पाच्या गळती प्रतिबंधक उपाययोजना व धरण मजबुतीकरणाच्या उर्वरित कामांसाठी 315 कोटी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
-सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातील कोयना जलाशयात 25 बुडीत बंधारे बांधण्याच्या प्रकल्पासाठी 170 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली.
-शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस एक वर्षांची मुदतवाढ.