अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स हे सध्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी सोमवारी (२१मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. उपाध्यक्ष व्हान्स यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उषा व्हान्स, मुलं आणि अमेरिकेच्या प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या भेटीत पंतप्रधान मोदींनी जानेवारीत अमेरिकेला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. तेव्हा त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सखोल चर्चा केली होती. या चर्चेमुळे भारत आणि अमेरिकेतील सहकार्य अधिक मजबूत होण्यास मदत झाली होती.
या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी “मेक अमेरिका ग्रेट अगेन (MAGA)” आणि “विकसित भारत 2047” या मोहीमांबद्दल चर्चा करत सहकार्य कसं वाढवता येईल यावर विचारविनिमय केला. व्यापार, ऊर्जा, संरक्षण, आणि आधुनिक तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी मिळून केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं. भविष्यात या क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला.
त्याशिवाय, दोन्ही देशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. तसेच संवाद आणि शांततामय मार्गाने प्रश्न सोडवण्यावर दोघांनी सहमती दर्शवली.
Pleased to welcome US @VP @JDVance and his family in New Delhi. We reviewed the fast-paced progress following my visit to the US and meeting with President Trump. We are committed to mutually beneficial cooperation, including in trade, technology, defence, energy and… pic.twitter.com/LRNmodIZLB
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2025
पंतप्रधान मोदींनी उपाध्यक्ष व्हान्स, त्यांची पत्नी आणि मुलांना भारतात येण्याचं आमंत्रण देत शुभेच्छा दिल्या. तसंच, त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनाही शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या भारत भेटीची उत्सुकतेने वाट पाहत असल्याचं सांगितलं.
या भेटीचे संभाव्य सकारात्मक परिणाम:
1. भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील. दोन्ही देशांतील विश्वास आणि सहकार्य वाढण्यास मदत होईल.
2. व्यापारात वाढ होईल.नवीन करारांमुळे दोन्ही देशांना आर्थिक फायदा होऊ शकतो.
3. ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारी वाढेल. नव्या तंत्रज्ञानाच्या विकासात सहकार्य मिळाल्यास भारताला मोठा फायदा होईल.
4. संरक्षण क्षेत्र मजबूत होईल.सामरिक भागीदारीमुळे दोन्ही देशांचा सुरक्षा भागीदारी मजबूत होईल.
5. प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी संयुक्त प्रयत्न.दोन्ही देश जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र काम करू शकतील.