विसाव्या आसियान-भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी केलेले भाषण
एकविसावे शतक हे आशियाचे शतक आहे.आपल्या सर्वांचे शतक आहे. म्हणून कोविडपश्चातचे विश्व एका नियमाधिष्ठीत धारणेतून निर्माण होणे आवश्यक आहे तसेच मानवकल्याणासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या विसाव्या आसियान-भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी भाषण केले त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या मैत्रीपूर्ण भागिदारीला आता चार दशके पूर्ण होत आहेत. अशा प्रसंगी भारत– आसियान शिखर संमेलनात सहअध्यक्षपद भूषविणे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची पर्वणी आहे अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांना आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
भारत आणि आसियान ऐतिहासिक तसेच भौगोलिक रूपानेही एकमेकांशी जोडलेले आहेत. त्याचबरोबर क्षेत्रीय एकता, शांति, समृद्धि, आणि विश्वाच्या बहुविध स्वरुपावरील असलेल्या आपल्या दोघांची असलेली श्रध्दा यामुळेही आपल्याला एकमेकांसोबत जोडले आहे. आसियान हा भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा प्रमुख स्तंभ आहे. भारताच्या हिंद प्रशांत पुढाकारात ही आसीयान क्षेत्राला प्रमुख स्थान दिले आहे असे सांगत त्यांनी भारत आणि आसियान संबंधांचे महत्त्व विशद केले.
Tags: NULL