भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये होत असलेल्या G20 शिखर परिषदेला जगातील दिग्गज नेते पोहोचू लागले आहेत. या परिषदेत विविध देशाचे ३० नेते व युरोपियन महासंघाचे उच्चस्तरीय अधिकारी सहभागी होणार आहेत. भारताने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. G20 संमेलन भव्यदिव्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडण्यात आलेली नाही. G-20 शिखर परिषद 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान प्रगती मैदानावर नव्याने बांधलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्र भारत मंडपम येथे होणार आहे.
जगातील ताकदवर देशाचे प्रमुख राजधानी दिल्ली मध्ये येत असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्लीत येणाऱ्या पाहुण्यांसाठी 50 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
दिल्लीच्या प्रगती मैदानावर होणाऱ्या या जी २० परिषदेला अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, युरोपियन युनियनचे उच्च अधिकारी आणि अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यंदा G20 परिषदेचे अध्यक्ष पद भारत भूषवणार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्याची भारतासाठी ही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.
Tags: NULL