जी 20 परिषदेसाठी दिल्ली सज्ज झाली आहे. जगभरातल्या सर्वोच्च अर्थव्यवस्था असणाऱ्या २० देशांचे प्रतिनिधी भारतात या परिषदेसाठी येण्यास उत्सुक आहेत. दरम्यान या परिषदेच्या ठिकाणी क्राफ्ट बाजाराचेही आयोजन केले असून देशभरातील विविध वस्तू इथे मांडण्यात येत आहेत. यावेळी महाराष्ट्राची पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल इथे येणाऱ्या विदेशी पाहुण्यांसाठी आकर्षण ठरत आहे. हि परिषद दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी होणार आहे.
देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये समतोल प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांचे व्हिजन प्रकट करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्पादन निवडणे, ब्रँड करणे आणि त्याचा प्रचार करणे ही सर्व प्रदेशांमध्ये सर्वांगीण सामाजिक-आर्थिक वाढीस गती देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.