राज्यात अनेक ठिकाणी पावसाने कालपासून पुन्हा जोर धरला असून पुढील २ दिवसांत हीच स्थिती कायम राहू शकते असा अंदाज IMD ने दिला आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
काल मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ झालेली पाहायला मिळाली परंतु दुसरीकडे उन्हाच्या तडाख्याने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक असं वातावरण असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत.