सध्या दिल्लीत जगातील शक्तिशाली देशांच्या प्रतिनिधींची G20 शिखर परिषद सुरू असून या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. या दरम्यान भारताने अध्यक्ष या नात्याने जगाच्या भविष्याच्या दृष्टीने एक महत्वाचा जाहीरनामा प्रस्तुत केला आहे. हा जाहीरनामा एकूण ३७ पानांचा असून यात तब्बल ८३ परिच्छेद आहेत. या जाहीरनाम्यात भारताने आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ तत्वाचा आधार घेत एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा मुद्दा मांडला आहे. दरम्यान G20 शिखर परिषद हे राजकीय मुद्द्यांचे व्यासपीठ नसून जगातील अर्थव्यवस्थेचे गणित या व्यासपीठावरून ठरवले जाण्यासाठी एकमताने सर्व सदस्य देशांनी संमती दर्शवली आहे.
भारताने प्रस्तुत केलेल्या जाहीरनाम्यातून भारत हा येत्या काळात जगाची दिशा ठरविण्यात यशस्वी होताना दिसत आहे.