जगभरातील शक्तिशाली नेते सध्या भारतात आहेत. भारतात पार पडत असणाऱ्या G 20 च्या निमित्ताने दिल्लीत मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आज या परिषदेचा दुसरा दिवस आहे. दरम्यान भारताचे जावई आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सपत्नीक दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात पोहोचले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी मंदिराबाहेर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ऋषी सुनक अक्षरधाम मंदिरात जलाभिषेक करणार आहेत.
काल भारत मंडपम् मध्ये पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान सुनक यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडली, यात दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि ब्रिटन दरम्यान व्यापार संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.