अहमदनगरच्या कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास पोलीस गस्तीसाठी गेले असताना उघडकीस आला प्रकार. जुलै २०१६ मध्ये कोपर्डी बलात्कार प्रकरण घडलेलं होतं. या घटनेचे पडसाद केवळ अहिल्यानगरपुरतेच नाहीत तर संपूर्ण राज्यभर उमटले होते. कोपर्डी प्रकरणानंतरच मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला. त्यानंतरच राज्यभरात मराठा मूक मोर्च्यांना सुरुवात झाली होती. आज पप्पू शिंदे याने आत्महत्या केल्यानंतर कोपर्डीतील पिडितेच्या कुटुंबियांनी अखेर निर्भयाला न्याया मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. अनेक दिवस या कुटुंबियांची आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी ही मागणी होती.