महाराष्ट्रातील मुंबई ते सोलापूर असा प्रवास करणारी वंदे भारत रेल्वे पुणे शहराला जोडली गेली आहे. ही रेल्वे गेल्या ६ महिन्यात सुरू झाली असून पुणे, सोलापूर आणि मुंबई मधील प्रवाशांनी इतर रेल्वेच्या तुलनेत या रेल्वेला चांगलीच पसंती दिली आहे.
या रेल्वेने गेल्या महिन्याभरात तब्बल २५ हजार प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती आहे. यातून रेल्वेला जवळपास २ कोटींची कमाई झाली आहे. पुणे रेल्वे स्थानकातून अद्याप वंदे भारत रेल्वे सुरू झाली नसली तरी मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारतला पुणेकरांचा चांगलाच प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळते.