यंदाची G 20 शिखर परिषद नुकतीच दिल्लीत पार पडली. जागतिक सलोख्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी भारताने सादर केलेला जाहीरनामा जगातील राष्ट्रप्रमुखांनी मान्य केल्यानंतर भारताचा जगभरात डंका वाजला आहे. आता भारताने आपले अध्यक्षपद यशस्वीपणे पूर्ण करून ते ब्राझीलकडे सोपवले आहे. दरम्यान येण्या वर्षातील G 20 परिषदेचे अध्यक्षपद ब्राझील कडे असणार आहे.
ब्राझील G 20 चा अध्यक्ष होताच त्यांनी रशियाच्या राष्ट्र प्रमुखांसदर्भात मोठी घोषणा केली आहे. दिल्लीत झालेल्या दोन दिवसीय परिषदेनंतर अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष पुतीन पुढील परिषदेसाठी ब्राझीलला आले तर त्यांना अटक केली जाणार नाही. G20 शिखर परिषदेतील भारताचे अध्यक्षपद संपले आहे. आता ब्राझील नवा अध्यक्ष झाला आहे