भारताच्या अध्यक्षतेखाली नुकतीच G 20 शिखर परिषद पार पडली. यावेळी सर्व विदेशी पाहुण्यांसाठी प्रीती भोजन आयोजित करण्यात आली आले होते. दरम्यान या सोहळ्याचे निमंत्रण भारतातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देण्यात आले. मात्र राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. परंतु तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निमंत्रण देण्यात आले आणि विशेष म्हणजे विनाभाजप मुख्यमंत्र्यांनी याकडे पाठ फिरवली असताना ममता दीदी मात्र या कार्यक्रमाला हजर राहिल्या. यामुळे काँग्रेसचे पित्त चांगलेच खवळले आहे.
काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरींनी ममता दीदींच्या डिनर पार्टीला जाण्यामागे काही खास कारण आहे का असा सवाल केला आहे!
ममता बॅनर्जी यांच्यासोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या सर्व प्रकारामुळे मोदींना चिमटीत पकडण्याचा मनसुबा रचणारे इंडिया आघाडीचे इतर लोक आणि मुख्यतः काँग्रेसचे नेते चांगलेच खवलेले पाहायला मिळते.