मध्यंतरी अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा जोर धरला होता. यामुळे मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु आता पुन्हा ढगाळ वातावरणासह ऊन सावल्यांचा खेळ रंगलाय. पावसाने पुन्हा ब्रेक घेतला असून गणेशोत्सवात पुन्हा पाऊस बरसण्याचा अंदाज IMDने वर्तवला आहे.
सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला असला तरी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत आहे. स्थानिक प्रशासन यावर तोडगा काढत असले तरी पावसाची गरज अशा भागात असल्याने नागरिक चिंतेत आहेत.