सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर आज मनोज जरांगेच्या भेटीसाठी मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह शासनाचे शिष्ठमंडळ उपोषणस्थळी दाखल झाले असून थोड्याच वेळात मनोज जरांगे ही त्यांच्या आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट करतील.
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत जळगावहून विशेष विमानाने औरंगाबादला पोहोचणार आहे. त्यानंतर ते जालन्यासाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी सामंत यांनी आंदोलनस्थळी उपस्थित असलेले शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे आणि नेते अर्जून खोतकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण चालू आहे.मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर ते ठाम आहेत.