आरक्षण हा आम्हा मराठ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. सरकार महिनाभराचा वेळ मागत आहे. पण यात निर्णय झाला नाही तर मात्र तीव्र आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करताना दिला आहे. मात्र जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या उंबऱ्यालाही शिवणार नाही”, असेही त्यांनी सांगितले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण चालू होते .मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी त्यांनी केली होती.
एक महिन्याच्या मुदतीवर सरकार ठाम असून तातडीने जीआर काढता येणार नसल्याचे सरकारने मराठा आंदोककर्ते मनोज जरांगे पाटलांना कळवले होते. टिकणारे आरक्षण हवे असल्यास तर एक महिन्याचा अवधी द्यावा अशी मागणी सरकारकडून करण्यात आली होती. आता सरकारला ही एक महिन्याची मुदत देण्यास मनोज जरांगे पाटलांनी होकार दिला आहे. दरम्यान, त्यांनी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला तरी आंदोलन संपणार नसल्याचीही भूमिका त्यांनी आज जाहीर केली आहे.