चांद्रयान 3, आदित्य L1 मिशनच्या यशस्वीतेनंतर भारताने विज्ञान क्षेत्रात आणखी मोठी झेप घेतली आहे. भारताचे समुद्रयान मिशन “मत्स्य 6000” समुद्रात 6 किलोमीटर खोलवर पोहोचणार आहे.
https://x.com/KirenRijiju/status/1701175948673269772?s=20
समुद्रात 6 किलोमीटर खोलवर 1.6 अंश एवढे थंड तापमान असताना समुद्रयानात मात्र सर्वसाधारण तापमान मेंटेन केले जाईल. समुद्रातल्या जैवविविधतेचा 3 शास्त्रज्ञ अभ्यास करतील आणि विशिष्ट मुदतीत समुद्रयात पुन्हा सुरक्षित परत येईल. या सागरी प्रकल्पाचा सागरी परिसंस्थेला कोणताही त्रास होणार नाही, अशी काळजी समुद्रयान निर्मितीतच घेण्यात आली आहे.
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरण रीजिजू यांनी ट्विट करून या संदर्भातली सविस्तर माहिती दिली आहे. चेन्नईतील समुद्र विज्ञान संस्थेने हे समुद्रयान तयार केले असून भारतात ब्लू इकॉनोमी अर्थात समुद्र विषयक अर्थव्यवस्था समृद्ध करण्याच्या विशेष अभ्यासासाठी हे समुद्रयान उपयोगी ठरणार आहे. समुद्रात 6 किलोमीटर खोलवर 3 वैज्ञानिकांना घेऊन जाण्याची या समुद्रयनाची क्षमता आहे. म्हणूनच याचे नाव “मत्स्य 6000” असे ठेवले आहे.