मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उपोषण सुरू केले होते.त्यांच्या उपोषणाचा आज 17 वा दिवस होता. जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः जालन्यात दाखल झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे पटील यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांना ज्यूस पाजला आणि त्यांनी उपोषण थांबवले. यावेळी ” माझ्यावर विश्वास ठेवा, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही “, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिले आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही जास्त आढेवेढे न घेता उपोषण मागे घेतले . त्यानंतर जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून तोंडभरून कौतुक केले.
आज जालन्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, गिरीश महाजन शिंदे गटाचे नेते माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर हेही उपस्थित होते.
उपोषणाची सुरवात करताना मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी केली होती