बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.आज पासून पुढील तीन दिवस राज्यात मॉन्सून सक्रिय होणार आहे. १५, १६ आणि १७ तारखेला जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर, नाशिक आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.