विश्वकर्मा जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विश्वकर्मा योजनेची सुरुवात नवी दिल्लीत होणार आहे. देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील कलाकार आणि कारागीरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं तसंच प्राचीन परंपरा, संस्कृती आणि वैविध्यपूर्ण वारसा जतन करणं हा या योजनेचा उद्देश आहे. स्थानिक उत्पादने, कलाकृती आणि हस्तकलेला या माध्यमातून चालना मिळणार आहे. 18 पारंपरिक हस्तकलांचा समावेश असलेल्या या योजनेचा उद्देश उत्पादनांची गुणवत्ता सुधारणं आणि या सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हा आहे.