गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्यामुळे आजपासून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना कोणताही टोल आकारण्यात येणार नाही. या निर्णयाचा फायदा लाखो भक्तांना होणार आहे. त्याचबरोबर परिवहन महामंडळाच्या बसेस सुद्धा या काळात टोलपासून मुक्त करण्यात येणार आहेत. १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान हा नियम लागू असणार आहे.
यासाठी वाहन चालकांना आणि परिवहन वाहनधारकांना पोलीस किंवा परिवहन खात्याकडून तत्सम पास घ्यावा लागणार असून तो पास दाखवल्यानंतर वाहनांना टोलपासून मुक्ती मिळणार आहे.