पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. जी 20 च्या बैठकीत प्रधानमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयांना, ठरावांना विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांनी एकमुखाने संमती दिली. ‘वसुधैव कुटूंबकम’ हा आपला मुलमंत्र आहे. सबका विकास, सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास या ठरावावरही एकमुखाने शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आता राज्यातही समाजपयोगी कार्यक्रम राबवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यामध्ये नमो ‘महिला सशक्तीकरण अभियान’ , ‘नमो कामगार कल्याण अभियान’, नमो शेततळी अभियान,नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान,नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान , नमो ग्राम सचिवालय अभियान, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, नमो दिव्यांग शक्ती अभियान यासारख्या अनेक योजनांचा या ११ कलमी कार्यक्रमात समावेश आहे.