येत्या २ दिवसांत राज्यात अनेक शहरात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. वातावरण दमट झाले असून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत अनेक शहरे, गावे आहेत. दरम्यान गणेशोत्सव ऐन तोंडावर असल्याने मात्र अनेक कामाच्या वेळी नागरिकांची धांदल उडाली आहे. सध्या वातावरणात उन पावसाचा खेळ सुरू आहे.
गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची बॅटिंग झाली आहे. तर अनेक ठिकाणी अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात नागरिकांना मैलोमैल पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान आता गणेशोत्सवात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.