आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीकडे 23 जागांची मागणी केली होती. उद्धव ठाकरेंची ही मागणी काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, इंडिया आघाडीमधील पक्षामध्ये एकी असणे गरजेचे आहे . प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्यात. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची 23 जागांची मागणी खूप जास्त होत आहे.
तर संजय राऊत 23 जागांची लिस्ट घेऊन आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठांकडे गेले आहेत. ते जर एवढ्या जागा लढवणार असतील तर आम्ही काय करायचं? असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. एवढ्या जागा ते घेणार असतील तर बाकीच्यांना काय करावे? हा माझा प्रश्न आहे? इंडिया आघाडीमध्ये तुम्ही येत आहात, मात्र जागांची मागणी करताना काळजी घ्या, असेही निरुपम म्हणाले आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने खूप जागा जिंकल्या होत्या, पण आता त्यांचे अनेक उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडे पुरेसे उमेदवार नसल्याचे समोर येत आहे.