लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेले मतदान आता अखेरच्या टप्प्यात आले
आहे. १ जून रोजी शेवटच्या टप्प्यातील
मतदान होणार आहे. त्याआधी भाजपचे नेते
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बालिया येथे प्रचारसभेला संबोधित
केले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर संविधानाच्या मुद्द्यावरून जोरदार
टीका केली आहे.
प्रचारसभेला संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी
आदित्यनाथ म्हणाले, ”डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी बनवलेले संविधानच भारतात लागू
होईल, आम्ही भारतात शरिया कायदा लागू होऊ देणार नाही. काँग्रेस आणि सपाचा
जाहीरनामा वाचा, हे लोक देशाचा विश्वासघात करत आहेत. आम्ही सत्तेत आल्यास एससी,
एसटी,
ओबीसीचे
आरक्षण कापून मुस्लिमांना देऊ, असे त्यांनी म्हटले आहे. ते धर्माच्या
आधारावर आरक्षणाबाबत बोलत आहेत. भाजप हे होऊ देणार नाही.”
सभेत बोलताना योगी आदित्यनाथ पुढे
म्हणाले, ‘इंडी आघाडीही पर्सनल लॉ लागू करण्याबाबत बोलत आहे. हे मान्य केले
जाणार नाही. मला विचारायचे आहे की जे अन्न अल्पसंख्याक खातात ते बहुसंख्य खात
नाहीत. ते एकाच ठिकाणी येऊन थांबतात. जेव्हा एखादा मुसलमान गाय कापण्याचे धाडस
करतो तेव्हा हिंदू घाबरतो. हिंदू म्हणतात की जन्म आणि जन्माचा संबंध आहे आणि गाय ही
आपली माता आहे. गोहत्या करणाऱ्यांना स्वातंत्र्य देणार का?, असा सवाल
योगींनी जनतेला केला. तुमच्याशी निगडित रामजन्मभूमी येथील भव्य मंदिराचे पुण्य
विरोधी आघाडीला मतदान करून पापात बदलेल, असे ते म्हणाले. त्यामुळे अशी चूक करू
नका.”