निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार आज लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात हिमाचल प्रदेश 14.35 टक्के मतदानात आघाडीवर आहे.
तर ओडिशात सर्वात कमी म्हणजे ७.६९ टक्के मतदान झाले आहे.
मतदान सुरू असलेल्या इतर राज्यांमध्ये- बिहार–10.58 टक्के, चंदीगड–11.64 टक्के, झारखंड–12.15 टक्के, पंजाब—9.64 टक्के, उत्तर प्रदेश–12.94 टक्के आणि पश्चिम बंगाल– 12.63 टक्के. असे मतदान सकाळी ९ वाजेपर्यंत झाल्याचे दिसून आले आहे.
देशभरात सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 11.31 टक्के मतदान झाले आहे. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली
भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, अंदाजे 5.24 कोटी पुरुष, 4.82 कोटी महिला आणि 3574 तृतीय लिंग मतदारांसह 10.06 कोटींहून अधिक मतदारांनी त्यांच्या मताधिकाराचा वापर करणे अपेक्षित आहे.
पंजाबमधील सर्व 13 लोकसभा मतदारसंघात आज शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे.
तर हिमाचल प्रदेशातील सहा विधानसभा जागांसाठी आज पोटनिवडणूक होणार आहे. ओडिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित 42 विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान सुरू आहे.
आज मतदान संपल्यानंतर, एक्झिट पोलचे निकाल विविध टीव्ही चॅनेलवर प्रसारित केले जातील. निवडणूक आयोगाने 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत मतदान संपेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घातली होती.