Monday, May 12, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

विजय दिनानिमित्त भारतीय शूरवीरांना अभिवादन… पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांनी केले स्मरण

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 16, 2024, 01:07 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज विजय दिवसानिमित्त १९७१ च्या ऐतिहासिक विजयात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे .या दिग्गज नेत्यानी आपल्या एक्स हँडल वर पोस्टच्या माध्यमातून भारत मातेच्या सुपुत्रांचे स्मरण केले आहे.

पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, “आज विजय दिवसाच्या दिवशी, आम्ही त्या शूर सैनिकांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करतो ज्यांनी 1971 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात योगदान दिले आहे . त्यांच्या निःस्वार्थ समर्पणाने आणि अटल संकल्पाने आमच्या राष्ट्राचे रक्षण केले आणि आम्हाला गौरव मिळवून दिला. हा दिवस त्यांच्या विलक्षण शौर्याला आणि त्यांच्या दृढ भावनेला समर्पित आहे. “त्यांचे बलिदान पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देईल आणि आपल्या देशाच्या इतिहासाच्या पानावर कायमचे कोरले गेले आहे .”

Today, on Vijay Diwas, we honour the courage and sacrifices of the brave soldiers who contributed to India’s historic victory in 1971. Their selfless dedication and unwavering resolve safeguarded our nation and brought glory to us. This day is a tribute to their extraordinary…

— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2024

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणतात की , “सर्वांना विजय दिवसाच्या शुभेच्छा.” विजय दिवस हे सैन्यातील शूर सैनिकांच्या धैर्याचे, अतूट समर्पणाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. १९७१ साली या दिवशी लष्कराच्या शूर जवानांनी शत्रूंचे धैर्य भेदून तिरंगा अभिमानाने फडकवलाच, पण मानवी मूल्यांचे रक्षण करून जगाच्या नकाशावर ऐतिहासिक बदल घडवून आणला. आपल्या शूरवीरांच्या शौर्याचा देशाला अनंतकाळपर्यंत अभिमान राहील.”

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ‘आज विजय दिवसाच्या विशेष प्रसंगी, देश भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम करतो. त्यांच्या अतुलनीय धैर्याने आणि देशभक्तीने आपला देश सुरक्षित राहिला. त्यांचे त्याग आणि सेवा भारत कधीही विसरणार नाही.

Today, on the special occasion of Vijay Diwas, the nation salutes the bravery and sacrifice of India’s armed forces. Their unwavering courage and patriotism ensured that our country remained safe. India will never forget their sacrifice and service.

— Rajnath Singh (@rajnathsingh) December 16, 2024

विजय दिवसाचे महत्त्व

पाकिस्तानवर भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जातो.1971 च्या युद्धाचा इतिहास

1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 3 डिसेंबरला युद्ध सुरू झाले आणि ते 13 दिवस चालले. तत्कालीन पूर्व पाकिस्तानात (आजचा बांगलादेश) होत असलेल्या मानवतावादी संकटामुळे हे युद्ध झाले. पाकिस्तानी लष्कराने तेथील सामान्य लोकांवर निर्दयी मोहीम सुरू केली होती. 16 डिसेंबर 1971 रोजी, पाकिस्तानी लष्कराचे कमांडर जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी भारतीय लष्कर आणि बांगलादेशच्या मुक्ती वाहिनीच्या संयुक्त सैन्यासमोर औपचारिकपणे आत्मसमर्पण केले. 1971 च्या मुक्तिसंग्रामात पाकिस्तानने केवळ 13 दिवसांच्या लढाईत पराभव स्वीकारला आणि ढाका येथे आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली. या विजयानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि बांगलादेश म्हणून अस्तित्वात आला.

एवढेच नाही तर त्यांच्यासोबत सुमारे ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले. दुसऱ्या महायुद्धानंतरचा हा सर्वात मोठा लष्करी पराभव मानला जातो. त्यामुळे ‘विजय दिवसाचे स्मरण करताना प्रत्येक भारतीयाला आपल्या सैन्याच्या शौर्याचा अभिमान वाटला पाहिजे. हा दिवस आपल्याला देशाच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी एकजुटीने काम करण्याची प्रेरणा देतो.

Tags: Amit shahIndo-Pakistan war of 1971.paid homagepm modirajnath singhSLIDERVijay Diwas
ShareTweetSendShare

Related News

LIVE | पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण
राष्ट्रीय

LIVE | पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

१९७१ च्या विजयात हरवलेली २०२५ ची काँग्रेस
आंतरराष्ट्रीय

१९७१ च्या विजयात हरवलेली २०२५ ची काँग्रेस

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नेमके काय घडले? वाचा सविस्तर
राष्ट्रीय

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नेमके काय घडले? वाचा सविस्तर

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?
राष्ट्रीय

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

Auto Draft
राष्ट्रीय

LIVE भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाप्रमुखांकडून ऑपरेशन ‘सिंदूर’ बाबत पत्रकार परिषद

Latest News

LIVE | पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

LIVE | पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

आता नक्षलवाद्यां विरोधातही कमांडोंची मोठी कारवाई; गडचिरोलीतील तळ केला पूर्ण उद्धस्त

आता नक्षलवाद्यां विरोधातही कमांडोंची मोठी कारवाई; गडचिरोलीतील तळ केला पूर्ण उद्धस्त

१९७१ च्या विजयात हरवलेली २०२५ ची काँग्रेस

१९७१ च्या विजयात हरवलेली २०२५ ची काँग्रेस

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नेमके काय घडले? वाचा सविस्तर

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नेमके काय घडले? वाचा सविस्तर

ऑपरेशन सिंदूर या मोहिमेतून भारताने नेमके काय मिळवले?

ऑपरेशन सिंदूर या मोहिमेतून भारताने नेमके काय मिळवले?

मित्रतेची किंमत: मदत करुनही या देशांनी भारताला दिला धोका

मित्रतेची किंमत: मदत करुनही या देशांनी भारताला दिला धोका

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

Auto Draft

LIVE भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाप्रमुखांकडून ऑपरेशन ‘सिंदूर’ बाबत पत्रकार परिषद

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.