Monday, May 12, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home आंतरराष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूर या मोहिमेतून भारताने नेमके काय मिळवले?

News Desk by News Desk
May 12, 2025, 04:26 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर 26 एप्रिल रोजी नवी दिल्लीच्या साउथ ब्लॉकमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारताने “निषेध नव्हे, तर निर्णायक कृती” करण्याचा इशारा दिला. त्यानंतर 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ ची घोषणा झाली. ही मोहीम म्हणजे भारताच्या संयमाचा अंत आणि सर्जनशील सामर्थ्याची सुरुवात होती. त्यानंतर 9 आणि 10 मेच्या रात्री भारताने एक निर्णायक पाऊल उचलत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (PoK) मध्ये खोलवर घुसून दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. “ऑपरेशन सिंदूर” या मोहिमेमुळे भारताने दहशतवाद आणि त्याच्या पाठीराख्यांविरोधात आपली कठोर भूमिका स्पष्ट केली. पण या महत्वाकांक्षी ऑपरेशन मधून भारताला नेमकं काय मिळालं? किंवा या ऑपरेशनच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला कशी अद्दल घडवली तेच आपण जाणून घेणार आहोत.

1. दहशतवादी छावण्यांचा खात्मा
या मोहिमेमध्ये भारताने लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या 9 महत्त्वाच्या छावण्या उद्ध्वस्त केल्या. ही ठिकाणं दहशतवादी कारवायांची केंद्रस्थानं होती.

2. पाकिस्तानच्या आरपार जाऊन कारवाई
भारताने केवळ PoK नव्हे, तर पाकिस्तानच्या मध्यभागात बहावलपूरसारख्या संवेदनशील भागात सुद्धा अचूक हल्ले करून दाखवले की जर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असेल.तर भारत आता कोणतीही लालरेषा ओलांडू शकतो,

3. दहशतवाद्यांसोबत पाठीराख्यांनाही लक्ष्य
पहिल्यांदाच भारताने स्पष्टपणे दाखवून दिलं की केवळ दहशतवादीच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या राज्यसंस्थांनाही लक्ष्य केलं जाईल.

4. पाकिस्तानच्या हवाई सुरक्षेची पोलखोल
भारतीय राफेल जेट विमानांनी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीला चकवा देत अत्यंत अचूकपणे लक्ष्य साधलं. SCALP आणि HAMMER सारख्या आधुनिक क्षेपणास्त्रांचा प्रभाव दाखवून दिला.

5. भारताच्या हवाई संरक्षणाची ताकद
‘आकाशतीर’ प्रणालीसारख्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांनी शेकडो पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना निष्प्रभ केलं, आणि भारताच्या संरक्षण सज्जतेचा स्तर उंचावला.

6. अत्यंत अचूक आणि मर्यादित हल्ले
भारताने केवळ दहशतवादी लक्ष्यांवर हल्ला करत कोणतीही नागरी हानी होणार नाही याची काळजी घेतली. ही ऑपरेशनची नैतिक बाजूही जगासमोर ठसवून सांगणारी बाब ठरली.

7. प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा
या हल्ल्यांमध्ये भारताच्या “मोस्ट वॉन्टेड” यादीतील अनेक दहशतवाद्यांचा नायनाट झाला. काही तळे आणि गटांचे नेतृत्वही एका रात्रीत संपवलं गेलं.

8. पाकिस्तानच्या लष्करी तळांना जबर झटका
एकूण 11 लष्करी तळांवर भारताने अचूक हल्ले केले. यात पाकिस्तानच्या हवाई दलाची 20% पायाभूत सुविधा नष्ट झाली आणि अनेक लढाऊ विमानं नष्ट झाली.

9. तीनही दलांचं संयुक्त यश
भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांची ही संयुक्त मोहीम होती, ज्याने भारताच्या वाढत्या युद्ध क्षमतेचं दर्शन घडवलं.

10. जागतिक पाठिंबा मिळवला
पूर्वी भारतावर संयम बाळगण्याचा दबाव टाकणाऱ्या देशांनी यावेळी दहशतवादाविरोधातील या कारवाईला पाठिंबा दर्शवला. हे भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचं मोठं यश ठरलं.

11. काश्मीरच्या कथनात बदल
या मोहिमेनंतर काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा “दहशतवादाविरोधाची लढाई” म्हणून जागतिक मंचावर सादर झाला, ज्यामुळे भारताने नैतिक उच्चतेचं स्थान मिळवलं

एकुणच ऑपरेशन सिंदूर” ही केवळ एक लष्करी कारवाई नव्हती, तर भारताच्या सहनशीलतेच्या शेवटाची आणि निर्णायक कृतीच्या सुरुवातीची ठोस घोषणा होती. यामधून भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की, सहनशीलतेला मर्यादा असते, आणि ती ओलांडली गेली की भारत शत्रूच्या घरात जाऊन उत्तर देऊ शकतो.ही मोहीम म्हणजे देशाच्या सुरक्षेचा नव्या परिघांमध्ये विस्तार, जागतिक स्तरावर भारताच्या विश्वासार्हतेत वाढ, आणि भविष्यातील धोरणांची स्पष्ट दिशा होती. भारताने या कारवाईतून फक्त दहशतवाद्यांना धडा शिकवला नाही, तर आत्मसन्मान, सामर्थ्य आणि नीतिमत्तेचा एक आदर्श उभा केला.आजचा भारत संवादासाठी तयार आहे, पण समर्पणासाठी नाही. आणि हेच “ऑपरेशन सिंदूर”ने ठामपणे सिद्ध केलं आहे.

🔥 #OperationSindoor: Major terror infrastructure CRUSHED!

— 9 terror camps OBLITERATED.
— 100+ terrorists NEUTRALIZED, including Yusuf & Rauf Azhar.
— Noor Khan, Murid, Rafiqui & Sialkot bases ATTACKED.
— Pasrur radar ANNIHILATED.
— Dhandhar post DEMOLISHED.
— 100+ drones SHOT… pic.twitter.com/CCTx1H07YJ

— Awaazx (@AwaazX_24x7) May 10, 2025

Tags: BADI BAATIndia Pakistan Tensionsindia pakistan warindian armyOperation Sindhoor
ShareTweetSendShare

Related News

१९७१ च्या विजयात हरवलेली २०२५ ची काँग्रेस
आंतरराष्ट्रीय

१९७१ च्या विजयात हरवलेली २०२५ ची काँग्रेस

मित्रतेची किंमत: मदत करुनही या देशांनी भारताला दिला धोका
आंतरराष्ट्रीय

मित्रतेची किंमत: मदत करुनही या देशांनी भारताला दिला धोका

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी
आंतरराष्ट्रीय

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम
आंतरराष्ट्रीय

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध
आंतरराष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध

Latest News

LIVE | पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

LIVE | पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

आता नक्षलवाद्यां विरोधातही कमांडोंची मोठी कारवाई; गडचिरोलीतील तळ केला पूर्ण उद्धस्त

आता नक्षलवाद्यां विरोधातही कमांडोंची मोठी कारवाई; गडचिरोलीतील तळ केला पूर्ण उद्धस्त

१९७१ च्या विजयात हरवलेली २०२५ ची काँग्रेस

१९७१ च्या विजयात हरवलेली २०२५ ची काँग्रेस

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नेमके काय घडले? वाचा सविस्तर

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नेमके काय घडले? वाचा सविस्तर

ऑपरेशन सिंदूर या मोहिमेतून भारताने नेमके काय मिळवले?

ऑपरेशन सिंदूर या मोहिमेतून भारताने नेमके काय मिळवले?

मित्रतेची किंमत: मदत करुनही या देशांनी भारताला दिला धोका

मित्रतेची किंमत: मदत करुनही या देशांनी भारताला दिला धोका

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

Auto Draft

LIVE भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाप्रमुखांकडून ऑपरेशन ‘सिंदूर’ बाबत पत्रकार परिषद

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.