Operation Sindoor: ७ मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले आणि दहशतवाद्यांना धडा शिकवला. मात्र भारताच्या या कारवाईनंतरपाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि दोन देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली. यादरम्यान काही उदारमतवादी (लिबरल) व्यक्ती भारत सरकारला तणाव कमी करण्यासाठी आणि युद्ध टाळण्याचा आग्रह करत होत्या. त्यानंतर १० मे रोजी भारत-पाकिस्तानने शस्त्रसंधी स्विकारली. परंतु भारताने शस्त्रसंधी स्विकारल्यानंतर याच लोकांनी भारताकडे स्वाभिमानाचा अभाव असल्याची टीका केली. तसेच राष्ट्रीय प्रतिष्ठेशी तडजोड केल्याबद्दल पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. याच पार्श्वभूमीवर ७ मे ते ११ मे २०२५ पर्यंत ऑपरेशन सिंदूर ते भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर दुटप्पी भूमिका घेणाऱ्या व्यक्तींनी सोशल मीडियावर मांडलेल्या मतांचा आढावा घेऊयात.
-शिरीन खान या महिलेने ७ मे रोजी पोस्ट केली होती की, युद्धाला थांबवा. मुलांना मारणे थांबवा. याच महिलेने युद्ध थांबल्यानंतर अर्थातच १० मे रोजी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “अमेरिका म्हटल्यामुळे युद्ध थांबले”. या पोस्टमधून या महिलेची दुटप्पी भूमिका लक्षात येते.
Say No to war.
Stop killing kids.— Shirin Khan (@ShirinKhan_13) May 7, 2025
At the end of the day,
Hota wahi hai jo US kehta hain.
— Shirin Khan (@ShirinKhan_13) May 10, 2025
-We Dravidians या यूजर नेमवरून एक्सवरती ९ मे रोजी पोस्ट करण्यात आले होते की, तामिळनाडू युद्धाला पाठिंबा देऊ इच्छित नाही. “आम्ही नेहमीच शांततेची मागणी! पण त्याचबरोबर आम्हाला सीमेवरीलआमच्या बंधू आणि भगिनींची मनापासून काळजी आहे.” याच अकाऊंटवरून ११ मे रोजी म्हणजे युद्ध थांबल्यानंतर पोस्ट करण्यात आले की, “युद्ध थांबवणे म्हणजे एका प्रकारे आपल्या लोकांचा बळी देऊन बनावट नाटक उभे केल्याचे रंगवले गेले मात्र अशाच वेळ खऱ्या नेत्याची आठवण करून येत, असे म्हणत इंदिरा गांधीचे नाव घेत इंदिरा गांधींना उगाच लक्ष करण्यात आले.
Tamil Nadu is not glorifying war.
We stand for peace — always!
But we are sincerely concerned about our brothers and sisters in the border states.#PeaceNotWar #TamilNaduForPeace #BorderStates #IndiaFirst #SayNoToWar
☮️🕊️🇮🇳 pic.twitter.com/UG8G6Igwiy— We Dravidians (@WeDravidians) May 9, 2025
The Art & The Artist.
No one can come close to her —
Her strategy, wisdom, and bold execution remain unmatched till now!While fakus stage dramas by sacrificing our own people,
It’s nothing but a circus to prep for elections.Time remembers the real leader.#IndiraGandhi… pic.twitter.com/nPIgBwEKcL
— We Dravidians (@WeDravidians) May 11, 2025
-Mumtaz Patel या अकाऊंटवरून ८ मे रोजी पोस्ट करून युद्ध चालू ठेवा अशी विनंती करण्यात आली होती. नंतर मात्र युद्धबंधी झाल्यानंतर याच अकाऊंटवरू १० मे रोजी अशी पोस्ट समोर आली की, “अमेरिकेने सांगितल्यामुळे थांबवले गेले पण इंदिरा गांधीं मात्र या आयर्न लेडी होत्या.
DE ESCALATE 🙏 #IndiaPakistanWar
— Mumtaz Patel (@mumtazpatels) May 8, 2025
America said back off but Indira Gandhi split a country in two.
Just Iron Lady things. Just India things ! #ironlady #IndiraGandhi #IndianArmy #IndiaPakistanConflict #india #Bangladesh #pakistan pic.twitter.com/5dvpNmcw0C— Mumtaz Patel (@mumtazpatels) May 10, 2025
Arfa Khanun Sherwani या युजरनेमवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये देखील अशीच दुटप्पी भूमिका दिसून आली. ८ मे रोजी या अकाऊंटवरू युद्ध थांबवण्याची विनंती करण्यात आली आहे. तर युद्धविरामानंतर ११ मे रोजी युद्ध थांबवल्याबद्दल मोदींच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
Peace is patriotism. War is destruction.
Borders don’t bleed—people do.Stop the war.
Deescalate NOW !!!
— Arfa Khanum Sherwani (@khanumarfa) May 8, 2025
In any self-respecting country, the PM would've resigned out of sheer embarrassment.
— Arfa Khanum Sherwani (@khanumarfa) May 11, 2025
-एक्सवर Neha Singh Rathore या अकाऊंटवरून भारत पाकिस्तान युद्धादरम्यान आणि युद्धविरामानंतर ज्या पोस्ट करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये प्रत्येक वेळी भूमिका बदलत संभ्रम उत्पन्न केल्याचे दिसून आले.
लाशें भारत और पाकिस्तान में गिर रही हैं
हथियार यूरोप वालों के बिक रहे हैं
बताओ युद्ध कौन जीत रहा है?#SayNoToWar
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) May 8, 2025
सुनिए प्रधानमंत्री जी…
…ट्रम्प को लवलेटर लिखना बंद कर दीजिए!
पड़ोसी मार के चला गया और आप अमरीका जाते हो!@narendramodi pic.twitter.com/rZxabngMxn
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) May 11, 2025
Ajay Kamath या अकाऊंटवरून ८ मे रोजी एक्सवरती प्रश्व उपस्थित करण्यात आला होता की, “दोन्ही देशांकडून तणाव कमी करण्यासाठी खरोखरच काही प्रयत्न झाले आहेत का?” मात्र युद्ध थांबताच ११ मे रोजी इथे पोस्ट करण्यात आलेला- मसूदा असा होता की, “आ राजनीती ओळखण्याची आणि खरे मित्र शोधण्याची गरज आहे.”
Does the United Nations still exist? Any serious attempt to get both countries to de escalate?
— Ajay Kamath (@ajay43) May 8, 2025
The one major takeaway from this conflict is this- we seriously need to up our diplomatic game and find real friends. NRIs dancing to welcome the PM mean nothing
— Ajay Kamath (@ajay43) May 11, 2025
– एक्सवरील Avinash Das या अकाऊंटवरून ८ मे रोजी युद्ध कधीच कोणी जिंकू शकत नाही अशा आशयाची पोस्ट करण्यात आली होती. तर युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींवर टीका करत मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यंगचित्र समोर आणले गेले.
युद्ध में कोई नहीं जीतता! pic.twitter.com/uHhSEOwzoS
— Avinash Das (@avinashonly) May 8, 2025
सरल व्यंग्य pic.twitter.com/q8ewysooo2
— Avinash Das (@avinashonly) May 10, 2025
या सगळ्या पोस्टचा आपण बारकाईने विचार केला तर लक्षात येते की, या व्यक्तींनी वेळोवेळी केंद्र सराकरच्या भूमिकेबदद्ल संभ्रम निर्माण करण्याच प्रयत्न जाणून बूजून केला आहे. अशा कठिण प्रसंगी एक भारतीय म्हणून देशाने घेतलेली भूमिका स्विकारत एकत्र येणे आणि आलेल्या संकटाचा आणि शत्रूचा धडाडीने सामना करणे हे आपले कर्तव्य असते. मात्र या लोकांनी सोशल मीडियावर मांडलेल्या त्यांच्या मतांवरून त्यांना नेमके काय करायचे आहे, याबद्दल त्यांच्या मनात पुरेशी स्पष्टता नसल्याचे दिसून येते.