प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाले असून त्यांना ३ महिने तुरुंगवास होण्याची शक्यता आहे.अंधेरी सत्र न्यायालयाने मंगळवारी चेक बाऊन्स प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झाले आहे. त्यांना ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अंधेरी सत्र न्यायालयाने मंगळवारी चेक बाऊन्स प्रकरणात दिग्दर्शकाला ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची सुनावणी गेल्या ७ वर्षांपासून सुरु होती. मंगळवारी राम गोपाल वर्मा स्वत: कोर्टात हजर नव्हते. म्हणून कोर्टाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. ज्यामुळे पोलिस त्यांना कधीही अटक करू शकतात. त्यांच्या कलम 128 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तसेच तीन महिन्यात वर्मांना ३.७२ लाखांची भरपाईही द्यावी लागणार आहे. अन्यथा त्यांना आणखी ३ महिने जेलमध्ये राहावे लागेल.
२०१८ मध्ये राम गोपाल वर्मां यांच्या फर्म विरोधात श्री नामक कंपनीकडून महेशचंद्र मिश्रा यांनी तक्रार दाखल केली होती. जून २०२२ मध्ये कोर्टाने या प्रकरणात वर्मांना ५००० रुपये दंड आकारला होता आणि जामीन देण्यात आलं होतं. मंगळवारी न्यायाधीश वाय पी पुजारी यांनी म्हणाले की कोणताही सेट ऑफ देण्याचा प्रश्नच येत नाही कारण आरोपी ट्रायलवेळी कोणताही काळ कस्टडीत नव्हता. यानंतर आता राम गोपाल वर्मा पुढील कोर्टात अपील करणार की त्यांना तुरुंगात जावे लागणार हे थोड्याच दिवसात समोर येणार आहे.