Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home राज्य

महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचे होणार आधुनिकीकरण; काय आहे अमृत भारत स्टेशन योजना?

News Desk by News Desk
Apr 12, 2025, 03:16 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Maharashtra Railway Station: राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल १३२ रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. अर्थातच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने विस्तृत योजना आखली आहे.

या योजनेत महाराष्ट्रातील लहान-मोठ्या अशा १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून या स्थानकांचे आधुनिकीकरण टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महत्त्वाच्या स्थानकांवर काम सुरू केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु पहिल्या टप्प्यात कोणत्या स्थानकांचा विकास केला जाईल, याची घोषणा अद्याप झाली नसून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

या योजनेमुळे राज्यातील अनेक जुन्या आणि गैरसोयीच्या रेल्वे स्थानकांना नवसंजीवनी मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक चांगला आणि सुखद अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, येत्या काही वर्षांत महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, अशी देखील आशा व्यक्त केली जात आहे.

‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत प्रवाशांना कोणत्या आधुनिक सोयीसुविधा मिळतील ?

– प्रवाशांसाठी आरामदायक आणि प्रशस्त प्रतीक्षालयांची निर्मिती केली जाणार आहे, ज्यात वातानुकूलित जागा आणि बसण्याची चांगली व्यवस्था असेल.

– रेल्वेस्थानकावर स्वच्छ आणि आधुनिक स्वच्छतागृहे बांधली जातील, तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केली जाईल.

– दिव्यांग प्रवाशांना सहजपणे ये-जा करता यावी यासाठी रॅम्प, लिफ्ट आणि विशेष स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाणार आहे.

-प्रवाशांना मार्गदर्शन प्रणाली स्थानकांवर डिजिटल डिस्प्ले बोर्ड आणि उद्घोषणा प्रणालीद्वारे गाड्यांच्या वेळापत्रकाची आणि प्लॅटफॉर्मची अचूक माहिती दिली जाईल.

– स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुरेशी सुरक्षा कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना सुरक्षित वाटेल.

-प्रवाशांच्या सोयीसाठी विविध खाद्यपदार्थ आणि आवश्यक वस्तूंची दुकाने स्थानकांवर उपलब्ध केली जातील.

– स्थानकांवर ऊर्जा-बचत करणारी आधुनिक प्रकाश योजना स्थापित केली जाणार आहे, ज्यामुळे रात्रीच्या वेळीही स्थानके व्यवस्थित प्रकाशित राहतील.

-रेल्वेस्थानक परिसरातील रस्ते, पार्किंग व्यवस्था आणि इतर सार्वजनिक सुविधांचा देखील विकास केला जाणार आहे.

 

या योजनेत समाविष्ट असलेल्या काही प्रमुख स्थानकांची नावे पुढीलप्रमाणे:
दादर
अंधेरी
लोकमान्य टिळक टर्मिनस
पुणे
नाशिक रोड
नागपूर
छत्रपती संभाजीनगर
कोल्हापूर
परभणी
सोलापूर
सातारा
सांगली
अमरावती
भुसावळ
अक्कलकोट रोड
दौंड
इगतपुरी
चांदा फोर्ट
मलाड
डोंबिवली
चिंचवड

Tags: amrut bharat yojanaashwini vaishanvbjpdevendra fadnvismaharahtra railway stationTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार
राज्य

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य
राज्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी
इतिहास,संस्कृती

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य
राज्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

संतांच्या शिकवणीला हरताळ? संत शेख महंम्मद महाराजांच्या समाधी स्थळाच्या वादाचा आढावा
इतिहास,संस्कृती

संतांच्या शिकवणीला हरताळ? संत शेख महंम्मद महाराजांच्या समाधी स्थळाच्या वादाचा आढावा

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.