पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्यावरून झालेल्या हिंसाचारामुळे अजूनही तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे खासदार बापी हलदर यांनी एक वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं की, जर कोणी वक्फ मालमत्तेकडे पाहण्याची हिंमत केली तर त्याचे डोळे काढू आणि त्याची हाडे तोडली जातील.मात्र आता त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वादाला तोंड फुटले असून यावरून पश्चिम बंगालमधील भाजप नेते आक्रमक झाले आहेत.त्यांनी या विधानावरून खासदार बापी हलदर यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप त्यांना अटक न केल्याने भाजपचे राज्याध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी राज्य पोलिसांचा निषेध केला.
ते म्हणाले की, जोपर्यंत ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत तुमच्या पूर्वजांच्या विश्वासाचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. ही कोणाच्याही वडिलांची मालमत्ता नाही. मुर्शिदाबादमध्ये हिंदूंना मुद्दाम त्रास दिला जात आहे त्यांना काही भागांतून स्थलांतर करावं लागत आहे. कट्टरपंथीय हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.”हिंसाचारामुळे मुर्शिदाबादच्या सुती, धुलियान, समसेरगंज आणि जंगीपूर भागात झालेल्या हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १८ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
दरम्यान मजुमदार यांनी एक्सवर पोस्ट करत तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, की,मथुरापूर मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे खासदार बापी हलदर यांनी एक भयंकर धमकी दिली आहे. डोळे काढण्याची आणि हातपाय तोडण्याची भाषा केली आहे. या कट्टरपंथीयांनी मुर्शिदाबादमधील असहाय्य, निष्पाप हिंदूंवर क्रूर छळ आणि हिंसाचाराला थेट प्रवृत्त केल्याबद्दल पोलिसांनी या व्यक्तीविरुद्ध काय कारवाई केली आहे?”
The fanatical, fundamentalist jihadi groups who, under the pretense of protesting against the Waqf Amendment Act, are continuously attempting to erase the existence of Hindus and are even throwing petrol bombs at the @BSF_India jawans—who is directly supporting them? This… pic.twitter.com/HZ5oiSWqIF
— Dr. Sukanta Majumdar (@DrSukantaBJP) April 13, 2025
सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आतापर्यंत १८० लोकांना अटक करण्यात आली आहे. जिथे हिंसाचार झाला, तिथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे आणि BNSS कायद्याच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव अजूनही वाहनांची तपासणी सुरू आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही या कायद्याला विरोध आहे. त्यांनी तर हा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू होऊ देणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचे नेतेही या कायद्याच्या विरोधात बोलत आहेत. खरतर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने डोळे काढायची भाषा करणे म्हणजे हा एक प्रकारे संविधानाचा अपमानच आहे. त्यांना जर वक्फ कायद्यावर आक्षेप असेल तर ते कोर्टात जाऊ शकतात. पण ते न करता केवळ अल्पसंख्याकांची मते मिळावी म्हणून ते वादग्रस्त विधाने करत असतील आणि सामाजिक सलोखा बिघडवत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.