Operation Sindoor: 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 2७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू पुरूषांना टार्गेट केल्याने देशात संतापाची लाट उसळली होती. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जावा, अशी भावना प्रत्येक भारतीयाची होती. अखेर आज 7 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास भारताने पाकिस्तानातील आणि पीओकेतील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत एअर स्ट्राईक केला आहे. त्यामुळे आज अनेक भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे आज अनेकजण भारतीय सैन्यासह मोदींचे कौतुक करत आहेत.
याच पार्श्वभूमीवप शरद पवार यांनीही भारतीय लष्कराचे आणि केंद्र सरकारचे अभिनंदन केले. ऑपरेशन ‘सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद साधला. भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचे अभिनंदनही केले. या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली आहे, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
Spoke with PMO and raksha mantri … congratulated the efforts of the Indian armed forces and commended them for the action taken. We reiterated our support to the govt during this challenging time.
ऑपरेशन 'सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 7, 2025
दरम्यान, या कारवाईमुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक महत्त्वाचे अड्डे नष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे आज अनेक भारतीयांनी समाधानाचा श्वास घेतला आहे. तसेच या कारवाईमुळे पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांनाही कुठेतरी न्याया मिळाला, अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे.