प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा याचा विवाह १२ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रतिष्ठित जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. त्या निमित्ताने मुकेश अंबानी, नवरदेव अनंत अंबानी,वधू राधिका मर्चंट यांच्यासह जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लग्नासाठी आमंत्रण केले.
उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत अनंत अंबानी यांचे लग्न 12 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील प्रतिष्ठित जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे.
सोमवारी रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले आणि भगवान शंकराला लग्नाचे पहिले निमंत्रण दिले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी मुंबईत एका भव्य सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. हा सोहळा म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ असेल असे सांगितले जात आहे.
पारंपारिक हिंदू वैदिक रितीरिवाजानुसार विवाह सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १२ जुलै रोजी लग्नसोहळा होणार आहे. त्या दिवशी सर्व निमंत्रितांना पारंपारिक भारतीय पोशाखात येण्याचे निमंत्रण आहे, शनिवारी, १३ जुलै रोजीही उत्सव सुरुच राहणार आहे. तर रविवारी १४ जुलै रोजी या नियोजित सोहळ्याची सांगता होणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी पाहुण्यांना ‘भारतातील विविधता’ दर्शवणारा ड्रेस कोड असणार आहे, असे सांगितले जात आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, या जोडप्याने जामनगरमध्ये प्री वेडिंग कार्यक्रम आयोजित केले होते. ज्यामध्ये जगभरातून स्टार पाहुणे उपस्थित होते. उद्योगपती, राजकारणी आणि हॉलिवूड आणि बॉलीवूड सेलिब्रिटीं यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम वैशिठ्यपूर्ण बनला.
मान्यवर पाहुण्यांमध्ये विदेशातून आलेले मेटा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि इव्हांका ट्रम्प यांचा समावेश होता.