उत्तरप्रदेशात काही दिवसांपूर्वी घडलेल्या चेंगराचेंगरीची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) 119 जबाब नोंदवले आहेत आणि मंगळवारी अहवाल सादर करताना म्हंटले आहे की, की ‘सत्संग’ आयोजित करणारी समिती जबाबदार होती कारण या कार्यक्रमामध्ये परवानगी न घेता मोठ्या संख्येने लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी ‘सत्संग’ या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी जबाबदार असलेली समिती जबाबदार असल्याचे अहवालात सूचित करण्यात आले आहे. समितीने परवानगी दिलेल्या संख्येपेक्षा जास्त लोकांना आमंत्रित केले, पुरेशी व्यवस्था करण्यात अपयशी ठरले आणि परवानगी देऊनही अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली नाही असे मुद्दे मांडण्यात आले आहेत.
जवळपास 300 पानांच्या अहवालात मृत आणि जखमी भाविकांच्या कुटुंबीयांसह 119 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एसआयटीने हाथरस येथील आशिष कुमार, एसपी निपुण अग्रवाल, एसडीएम आणि सत्संगासाठी परवानगी देणारे सीओ सिकंदरराव, तसेच 2 जुलै रोजी झालेल्या सत्संगासाठी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी यांचेही जबाब नोंदवले आहेत. .
तसेच यावेळी एडीजी आग्रा झोन अनुपम कुलश्रेष्ठ आणि अलिगडचे आयुक्त चैत्रा व्ही उपस्थित होते. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.
याआधी सोमवारी, या घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला की मोठ्या संख्येने भाविकांनी “बाबांची चरण धुळ”गोळा करण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी झाली.
मुगलगढ़ी गावातील सुधीर प्रताप सिंह म्हणाले, “बाबांनी भक्तांनी पायाच्या आजूबाजूची माती उचलण्याची घोषणा केल्यानंतर ही घटना घडली. भक्तांनी घाईघाईत माती गोळा करायला धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाली मात्र “बाबांच्या ताफ्याने चेंगराचेंगरीच्या वेळी घटनास्थळ सोडले. केवळ स्थानिकांनी आणि प्रशासनाने तेथे उपस्थित असलेल्या भाविकांना मदत केली,” असे सिंह म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेश न्यायिक आयोगाच्या पथकाने हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत.
दरम्यान, भोले बाबांचे वकील एपी सिंग यांनी दावा केला की या घाटने दरम्यान विष फवारलेल्या अज्ञात व्यक्तींमुळे हा अपघात झाला. चेंगराचेंगरी करून कट रचणाऱ्यांच्या गटाने घटनास्थळावरून पळ काढला, असे सिंह यांनी ठामपणे सांगितले. “सत्संगात चेंगराचेंगरीची घटना अपघात नसून एक कट होता,” असे ते म्हणाले आहेत.
ही घटना 2 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस येथील फुलारी गावात स्वयंभू देवता सूरज पाल उर्फ ’भोले बाबा’ यांच्या धार्मिक ‘सत्संग’ कार्यक्रमात घडली होती. .
दरम्यान या चेंगराचेंगरीतील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याला शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांनी या कार्यक्रमासाठी लेखी परवानगी घेतली होती का आणि ती कोणाकडून घेतली होती, अशी विचारणा न्यायालयाने केली. मधुकर यांनी उत्तर दिले की त्यांना 80,000 लोकांच्या मेळाव्यासाठी एसडीएमकडून परवानगी मिळाली होती.
मधुकर हा फरार झाला होता आणि त्याला अटक करण्यासाठी माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अखेर 5 जुलै रोजी त्याला राष्ट्रीय राजधानीत पकडण्यात आले. याशिवाय, रामप्रकाश शाक्य आणि संजू यादव या अन्य दोन आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे.