Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर , एनडीआरएफची टीम तैनात

Rupali Gowande by Rupali Gowande
Jul 15, 2024, 01:32 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

महाराष्ट्रातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण, संगमेश्वर आदी शहरात पावसाचे पाणी शिरले आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली असून नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हवामान खात्याने (IMD) सोमवारी राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. IMD ने अतिवृष्टीबाबत रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पालघर आणि धुळे या शहरांसाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये गड नदीला पूर आला असून पुराचे पाणी संगमेश्वरच्या बाजारपेठेत शिरले आहे. संततधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील कोंड, आंबेड-डिंगणी-कर्जुवे, धामणी, कसबा आदी भाग जलमय झाले आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. लोकांना सतर्क करण्यात आले आहे.

रत्नागिरीच्या खेड-दिवाणखावटीमध्ये नदीला पूर आला असून सात गावांचा संपर्क तुटला आहे. गणेशवाडीतील सात वाड्यांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे महसूल व पोलीस प्रशासन सतर्क आहेत.

रायगड जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा नद्यांनी धोक्याचा टप्पा ओलांडला असून प्रशासनाने रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली, आपटा परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

रोहा शहरातील कुंडलिका नदीवरील लहान पूलावरून पाणी वाहू लागल्याने तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूरमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.जिल्ह्यातील सावित्री नदीला पूर आला असून, पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिल्यास नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफची टीम सावित्री नदीच्या पाणीपातळीवरही लक्ष ठेवून आहे.

चिपळूण शहरात वाष्टी नदीचे पुराचे पाणी शिरू लागले असून वाष्टी नदीने धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. नायके कंपनी परिसरातील बाजारपेठांमध्ये पाणी शिरू लागले असून चिपळूणमधील प्रशासन सतर्कतेवर असून, शहरात एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. चिपळूण शहर प्रशासनाकडून व्यापारी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे खेड तालुक्यातील बहिरवली व खडीपट्टा विभागाला जोडणारा देवणे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. खेड शहरातून देवणे पुलाकडे जाणारा रस्ता आधीच पाण्यात बुडाला असून नारंगी नदीचे पाणी देवणे पूरक्षेत्रावरून वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सुसरी क्रमांक एकचा पूल बुडाल्याने खेड भैरवलीकडे जाणारा पर्यायी मार्गही पूर्णपणे ठप्प झाला आहे.

भिवंडी शहरासह ग्रामीण भागालाही ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका बसला असून खाडीपार परिसरात 3 ते 4 फूट पाणी साचले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तीन बत्ती, सब्जी मंडी, ईदगाह रोड, खाडीपार परिसरातही पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. कल्याण परिसरातही पाऊस सुरूच आहे. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने कल्याण-नगर रस्त्यावरील रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Tags: heavy rainimdmaharashtra monsoonmonsoon 2024 forecastndrfTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.