Maharashtra Government : महाराष्ट्र्र सरकार राज्यातील तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे, अशातच आता राज्यातील बळीराजासाठी सरकार एक योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वीजपुरवठा मोफत दिला जाणार आहे. या योजनेचे नाव बळीराजा मोफत वीज योजना असे आहे.
नुकतीच राज्य सरकारने महिलांसाठी एक योजना आणली. या योजनेचे नाव माजी लाडकी बहिण योजना असे आहे. या योजने अंतर्गत महिलांना आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.
काय आहे बळीराजा मोफत वीज योजना?
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजने संदर्भातील परिपत्रक देखील काढण्यात आले आहे. ही योजना एप्रिल 2024 पासून मार्च 2029 पर्यंत राबवली जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ही योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचा लाभ राज्यातील तब्बल 44 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. याकरिता 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ही योजना कधीपासून लागू होईल?
या योजनेची घोषणा जून महिन्यात करण्यात आली आहे, मात्र याची अंमलबजावणी एप्रिल 2024 पासूनच केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मागच्या तीन महिन्यांचं वीजबिल भरावं लागणार नाही.
ही योजना पुढील पाच वर्षासाठी सुरु राहील. एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत बळीराजा मोफा वीज योजना सुरु असणार आहे.
कोणते शेतकरी पात्र असतील?
-राज्यातल्या 7.5 एचपीपर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
-‘महाराष्ट्रात 47.41 लाख कृषी पंप ग्राहक आहेत. एकूण वीज ग्राहकांपैकी 16 टक्के ग्राहक हे कृषीपंप वापरतात.’
-एकूण कृषी पंप ग्राहकांपैकी 44 लाख 3 हजार शेतकरी हे 7.5 एचपी क्षमता असलेले कृषी पंप वापरतात आणि या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
फक्त 7.5 एचपी पंपांसाठी हा निर्णय घेतला गेलेला नसून 7.5 एचपीपेक्षा कमी क्षमतेचे आणि 7.5 एचपीचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
-तर ज्या शेतकऱ्यांकडे 7.5 एचपीपेक्षा अधिक क्षमतेचे कृषी पंप आहेत त्यांना मात्र वीजबिल भरावे लागणार आहे.