Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home कायदा

वक्फ बोर्डाच्या मनमानीवर निर्बंध आणणार ; मोदी सरकारचे मोठे पाऊल

Rupali Gowande by Rupali Gowande
Aug 5, 2024, 12:37 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

देशातल्या आपल्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरवात झाल्यानंतर मोदी सरकार आता वक्फ बोर्डाचे अधिकार कमी करण्याच्या तयारीत आहे. सध्या चालू असलेल्या अधिवेशनात ह्याबाबतचे दुरुस्ती विधेयक आणण्याचा विचार सुरू आहे. याआधी शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वक्फ कायद्यातील ४० सुधारणांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. संसदेत हे दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर वक्फ बोर्डाचे अनियंत्रित अधिकार कमी होतील. तसेच पडताळणीशिवाय कोणत्याही मालमत्तेचा ताबा वक्फ बोर्ड जाहीर करू शकणार नाही.तसेच यानंतर वक्फ बोर्डाने केलेल्या मालमत्तेच्या दाव्यांची पडताळणी अनिवार्य केली जाऊ शकते.

 

1954 मध्ये केंद्र सरकारने वक्फ विधेयक मंजूर केले होते आणि त्यानंतर 1964 मध्ये केंद्रीय वक्फ परिषद स्थापन झाली होती.त्यानंतर 995 मध्ये, प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात वक्फ बोर्ड स्थापन करण्यास परवानगी देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली होती.तसेच 2013 मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने कायद्यात बदल करून वक्फ बोर्डाच्या अधिकारात आणखी वाढ केली होती.

वक्फ बोर्ड वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन करते. वक्फ ही मुस्लिम समाजाने दान केलेली मालमत्ता आहे. वक्फ मालमत्ता आणि या मालमत्तेतून मिळणारा नफा राज्य वक्फ बोर्डांद्वारे व्यवस्थापित केला जातो. मात्र आज वक्फमध्ये सामान्य मुस्लिमांना स्थान नाही. फक्त शक्तिशाली लोकांचा समावेश आहे. यामध्ये महसूल किती येतो याचा अंदाज उघडपणे सांगितला जात नाही. देशात सध्या 30 वक्फ बोर्ड आहेत. सर्व वक्फ मालमत्तांमधून दरवर्षी 200 कोटी रुपयांचा महसूल मिळतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच वक्फ बोर्डाकडे 8.50 लाखांहून अधिक मालमत्ता आहेत, ज्या सुमारे 9.4 लाख एकर क्षेत्रात आहेत. सामान्य मुस्लीम, गरीब मुस्लीम महिला, घटस्फोटित मुस्लीम महिलांची मुले, शिया आणि बोहरा यांसारखे समुदाय या कायद्यात बदल करण्याची मागणी बऱ्याच काळापासून करत होते.

याआधीही केंद्रातील एनडीए सरकारने राज्य वक्फ बोर्डाला असलेल्या कोणत्याही मालमत्तेवर हक्क सांगण्याच्या व्यापक अधिकाराची दखल घेतली होती. बहुतांश राज्यांतील अशा मालमत्तांच्या सर्वेक्षणाला होत असलेल्या विलंबाची सरकारनेही दखल घेतली होती. मागील एनडीए सरकारमध्ये वक्फ मालमत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देखरेख प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा विचार केला जात होता. त्यानंतरही वादग्रस्त मालमत्तेच्या प्रकरणात अपील प्रक्रियेत त्रुटी असल्याचे सांगण्यात आले होते. ओमान, सौदी अरेबिया तसंच अन्य इस्लामी देशांमधील कायद्याच्या प्राथमिक अवलोकनानंतर या देशांमध्येही वक्फ बोर्डाला इतके अधिकार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.

वक्फ बोर्डाच्या अनियंत्रित शक्तींवर तसेच एकतर्फी निर्णयांवर यामुळे निर्बंध येणार आहेत. तसेच विधेयकात दुरुस्ती करून वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर मर्यादा येणार आहेत. याशिवाय मंडळाच्या रचनेतही बदल करून त्यात अधिकाधिक महिलांचा सहभाग सुनिश्चित करता येईल.तसेच या सुधारणेनंतर गरीब मुस्लिमांना न्याय मिळेल असे सांगितले जात आहे.

Tags: BADI BAATloksabha sessionNDA governemntpm naredra modiVakf BoardWakf ActWaqf Board bill
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update
राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.