Rau’s IAS Study Circle : दिल्लीतील राव कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याने तीन UPSC मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दंडाधिकारी चौकशीत MCD (Municipal Corporation of Delhi) आणि अग्निशमन विभागाने अनेक कायद्यांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले.
एमसीडी आणि अग्निशमन विभागाच्या अधिका-यांनी यापूर्वी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले होते, तरीही कारवाई करण्यात आली नाही, असे तपासणी अहवालात म्हटले आहे. दंडाधिकारी तपासात आयएएस स्टडी सर्कलवरही ठपका ठेवण्यात आला आहे. महसूलमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालात अनेक खुलासे झाले आहेत.
राव कोचिंग सेंटरचे मालक आणि व्यवस्थापनही विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वा न करता तळघरात बेकायदेशीर लायब्ररी चालवत असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालात असे दिसून आले आहे की इमारतीतील ‘नियमांचे उल्लंघन’ एमसीडी आणि अग्निशमन विभागाच्या अधिका-यांच्या निदर्शनास आले होते, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
या चौकशीत विद्यार्थी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह 15 जणांची चौकशी करण्यात आली. एमसीडीने येथील अतिक्रमण हटवले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच गेल्या पाच वर्षांपासून परिसरातील नाल्यांमधील गाळ काढण्यात आलेला नाही. असेही या अहवालात सांगण्यात आले.
राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटरच्या तळघरात झालेल्या अपघातप्रकरणी तुरुंगात असलेल्या चार तळघर सहमालकांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने बुधवारी सीबीआयला नोटीस बजावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू बजाज चंदना यांनी केंद्रीय तपास यंत्रणेला ९ ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरच कोर्ट चार आरोपी परविंदर सिंग, तजिंदर सिंग, हरविंदर सिंग आणि सरबजीत सिंग यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करणार आहे.
नोटीस जारी करताना न्यायालयाने म्हटले आहे की, एफआयआरची प्रत न्यायालयासमोर आणली गेली नसल्याने आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर निर्णय देता येणार नाही. जुन्या राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटर इमारतीच्या तळघरात झालेल्या मृत्यूचा तपास हायकोर्टाने नुकताच पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवला होता.