IND vs BAN : भारत-बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीचा चौथा दिवस भारतीयांच्या नावावर होता. कानपूरमध्ये सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी तुफानी बॅटिंग केली. भारताने 25 षटकांत 200 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या या सर्वात जलद 200 धावा आहेत.
दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाचा जबरदस्त फलंदाज विराट कोहलीने देखील एक उत्कृष्ट कामगीरी केली. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम आधी सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. आता विराटने सचिनचा हा विक्रम मोडत इतिहास रचला आहे.
कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला जबरदस्त सुरुवात करून दिली. इतर फलंदाजांनीही त्याच गतीने फलंदाजी केली. बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीत भारताने कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वात जलद 250 धावा करण्याचा विक्रम केला. याआधीही वेगवान धावांचा विक्रम भारताच्या नावावर होता. भारतीय संघाने हा विक्रम 2023 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केला होता.
Another day at office, another milestone breached!@imVkohli now has 27000 runs in international cricket 👏👏
He is the fourth player and second Indian to achieve this feat!#INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ijXWfi5v7O
— BCCI (@BCCI) September 30, 2024
वेगवान 200 धावांचा विक्रम आधी ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. या संघाने 2017 मध्ये सिडनी येथे पाकिस्तानविरुद्ध 28.1 षटकात 200 धावा केल्या होत्या. मात्र, भारताने बांगलादेशविरुद्ध 148 चेंडूत (24.4 षटके) 200 धावांचा टप्पा गाठला. या सामन्यात विराट कोहलीला अर्धशतक झळकावता आले नाही. त्याने 35 चेंडूत 47 धावा केल्या. मात्र, ५९४ इनिंग्जध्ये त्याने २७ हजार धावा पूर्ण करत इतिहास रचला.