Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

“हिंदुत्वाचे आत्मभान हेच विकसित भारताचे सूत्र” – शेफाली वैद्य

Rupali Gowande by Rupali Gowande
Oct 8, 2024, 06:01 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पुणे : देश टिकला तरच संस्कृती टिकेल, हे सत्य आपण लक्षात ठेवायला हवे. अनेक देशांमध्ये आपल्याप्रमाणेच संस्कृती विकसित झाल्या होत्या. मात्र कालौघात त्या नष्ट झाल्या. पेरु देशात असलेली समृद्ध इंका सभ्यता स्पेनच्या आक्रमणानंतर केवळ ५२ वर्षात नष्ट झाली, मात्र दुसरीकडे भारतात गोव्यामध्ये ४५० वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतरदेखील गोवा आजही हिंदु बहुलच आहे. आपल्या संस्कृतीवर असे अनेक आघात होऊनही ती टिकून राहिली आहे, हे आपले वैशिष्ट्य आहे”, असे मत सुविख्यात लेखिका शेफाली वैद्य यांनी व्यक्त केले.

सिंहगड रस्ता, पुणे येथील नांदेड‌ सिटी भागात श्री स्वामी समर्थ महाराज आणि महाअवतार बाबाजी मठाच्या वतीने, नवरात्रीनिमित्त एका विशेष प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास परिसरातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने शेफाली वैद्य यांचा सन्मान श्री. नरसिंहजी लगड व कुटुंबिय यांनी केला तर नांदेड सिटीतील मराठवाडा मित्र मंडळ , लिंगायत समाज व निळकंठेश्वर देवस्थानच्या वतीने देखील शेफाली वैद्य यांचा सन्मान या वेळी केला गेला.

समाजमाध्यमांतून हिंदुत्वाचा विचार प्रभावीपणे आणि निर्भयपणे मांडणा-या शेफालीताई या ख-या अर्थाने दुर्गास्वरूप आहेत, हे त्यांच्या परिचयात विशेषत्वाने सांगितले गेले.

ज्येष्ठ गायक श्री. प्रमोद रानडे यांनी गायिलेल्या देशभक्तिपर गीतानंतर श्रीमती शेफाली वैद्य यांनी ‘विकसित भारत – अंतर्गत आव्हाने’ या सूत्रावर आपल्या विषयाची मांडणी केली.

त्या पुढे म्हणाल्या की, “स्त्रियांना उपजत सौंदर्य दृष्टि असते आणि त्यामुळेच अगदी लहानात लहान घरांमध्येदेखील तुळस, रांगोळीसारख्या गोष्टींमधून ही सुंदरता दृष्टीला पडते” असे सांगत त्यांनी विषयप्रवेश केला.

“हिंदुत्वामध्ये सुद्धा हीच सौंदर्यदृष्टी असून संस्कृतीचा हा गंगाप्रवाह युगायुगांपासून चिरंतन वाहत आहे. मात्र जगभरात इस्लामच्या झंझावातापुढे अनेक देश अल्पावधीत इस्लाममय झाले असले तरी भारतात मात्र इस्लामला कडवा प्रतिकार झाला. फक्त संघटना आणि शत्रुबोधाचा अभाव असल्याने आपण पराधीन झालो, हे वास्तव आपण लक्षात घ्यायला हवे. आजही प्रामुख्याने हीच दोन आव्हाने विकसित भारतापुढे आहेत”, असे पुढे बोलताना त्यांनी सांगितले.

विकसित भारताची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काही उदाहरणे सांगितली. २०१४ पूर्वी घरकाम करणा-या मावशींचे जे बँक खाते कागदपत्रे नसल्यामुळे उघडता येत नव्हते, तेच २०१४ नंतर मात्र जनधन योजनेत सहजपणे उघडले गेले आणि पुढे या मावशींचे आयुष्यच बदलून गेले, असा स्वतः अनुभवलेला प्रसंग त्यांनी कथन केला.

तसेच उज्ज्वला गॅस आणि नळ योजनेमुळे पाणी भरणे, सरपण आणणे यात महिलांचा जाणारा मोठा वेळ वाचला आणि या वेळात नवी कौशल्ये महिला शिकू लागल्या, असेही निरीक्षण त्यांनी ससंदर्भ मांडले.

मध्य प्रदेशातील एका खेड्यातील अनुभव सांगताना तेथील महिलेने उत्साहाने घरासोबत टॉयलेटही दाखवल्याचे शेफालीताई यांनी सांगितले. सामान्य लोकांच्या आयुष्यात हा खूपच मोठा बदल असून असा अंत्योदय म्हणजेच खरा विकसित भारत आहे, असे त्या म्हणाल्या.

“वर्ष २०१४ नंतर गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र ही मंत्रालये विशेष लक्ष देऊन सांभाळली गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे अंतर्गत सुरक्षा, सशक्त अर्थव्यवस्था, बाह्य शत्रुंना धाक आणि जगात उंचावलेली भारताची प्रतिमा ही फलिते आपल्याला मिळाली. हा केवळ कणखर नेतृत्वाचा प्रभाव आहे”, हे त्यांनी विशद केले.

आजच्या आव्हानांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “रोजगार निर्मितीचे आव्हान नक्कीच आहे आणि त्याकरिता तरुणांमध्ये उद्योजकता वृत्ती वाढण्याची गरज आहे. मात्र अराष्ट्रीय शक्तींच्या कारवायांचे आव्हान त्यापेक्षाही गंभीर आहे. आज इथे सहज होणारी सभा पुण्यातीलच अन्य काही संवेदनशील ठिकाणी घेता येणार नाही, अशी आजची स्थिति आहे. लोकसंख्या गुणोत्तर बदलते आहे आणि परिस्थिति भयानक होत आहे, हे वास्तव समजून घेतले पाहिजे.” काश्मीरमध्ये नव्वदच्या दशकात झालेल्या हिंदूंच्या शिरकाणाचा उल्लेख करीत त्यांनी तिथल्या प्रत्यक्षदर्शींचे थरारक अनुभव सांगितले आणि मागील वर्षीच इस्राइल मध्ये झालेले भयंकर आक्रमण इथेही होऊ शकते, हे आपण लक्षात घ्यायला हवे, असेही त्या या प्रसंगी म्हणाल्या.

आपल्या व्याख्यानाचा समारोप करताना, ‘आपल्याला आपला भारत सुरक्षित ठेवायचा असेल तर समाज फोडण्याची षडयंत्रे समजून घेतली पाहिजेत आणि आपण हिंदू आहोत, हे आत्मभान सदैव बाळगले पाहिजे’ असा स्पष्ट संदेश शेफाली वैद्य यांनी उपस्थितांना दिला.

या वेळी गुरुश्री मठाधिपती श्री स्वामी समर्थ महाराज, मठाचे संचालक श्री. नरसिंहजी लगड, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुधीर काळकर, स्त्री शक्ति च्या श्रीमती अर्चना कौलगुड आणि अन्य अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीमती विद्याताई सर्जे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि श्री. सुधीर काळकर यांनी आभार प्रदर्शन केले. सामूहिक पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags: Navartra 2024pune newsshefali vaidya
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.