Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

२३ वर्षांपूर्वी याच दिवशी झाला होता संसदेवर हल्ला,पंतप्रधान मोदींकडून शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 13, 2024, 12:58 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर सदस्यांनी आज संसदेवरील दहशतवादी हल्ल्याच्या 23 व्या स्मरणदिनानिमित्त सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेमध्ये श्रद्धांजली अर्पण केली आहे .यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, किरेन रिजिजू आणि इतर नेते उपस्थित होते.

13 डिसेंबर 2001 रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमध्ये 9 सुरक्षा रक्षक शहीद झाले तर 16 सुरक्षा रक्षक जखमी झाले. या शहीद झालेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये जगदीश प्रसाद यादव, मतबर सिंग नेगी, नानक चंद, रामपाल, ओमप्रकाश, बिजेंद्र सिंग, घनश्याम, केंद्रीय राखीव पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी आणि सीपीडब्ल्यूडी कर्मचारी देशराज यांचा समावेश आहे.

नेमके काय घडले त्या दिवशी ?

13 डिसेंबर 2001 हा भारतीय इतिहासातील एक काळा दिवस ठरला होता. आज, शुक्रवारी या घटनेला तब्बल 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण अजूनही अनेकांच्या मनात या आठवणींची जखम कायम आहे. पण भारतीय लोकशाहीवर झालेला हल्ला केवळ ४२ मिनिटांमध्ये सगळे काही हादरवून गेला होता. त्यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेनंतर सभागृहाचे कामकाज 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानासाठी सभागृह सोडले होते, परंतु लालकृष्ण अडवाणी, प्रमोदी महाजन यांच्यासह अनेक नेते सभागृहातच उपस्थित होते.

11.30ची वेळ होती, तत्कालीन उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे अंगरक्षक त्यांची वाट पाहत होते. त्याचवेळी गेट क्रमांक १२ मधून पांढऱ्या रंगाची ॲम्बेसेडर कार आत शिरली. गाडीवर गृह मंत्रालयाचे बनावट स्टिकर होते. या कारमध्ये 5 दहशतवादी आणि शस्त्रास्त्रांचा साठा होता. गाडी पुढे गेल्यावर सुरक्षा कर्मचारी गाडीच्या मागे धावले. दरम्यान, दहशतवाद्यांची कार उपराष्ट्रपतींच्या कारला धडकली. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांकडे AK-47, पिस्तूल आणि हँडग्रेनेड होते, तर त्यावेळी सुरक्षा रक्षक निशस्त्र होते. गोळ्यांचा आवाज ऐकून सीआरपीएफची बटालियन सक्रिय झाली. उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले. सर्व गेट लगेच बंद करण्यात आले. संसदेत उपस्थित असलेले सर्व मंत्री, खासदार आणि अधिकाऱ्यांना आत सुरक्षित राहण्यास सांगण्यात आले आहे.

एका दहशतवाद्याने गेट क्रमांक 1 मधून संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता तेथे सुरक्षा जवानांनी त्याला ठार केले. यावेळी त्यांच्या शरीराला जोडलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. आता सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती.लोकशाहीचे मंदिर आता रणांगण बनले होते. इतर चार दहशतवाद्यांनी गेट क्रमांक 4 मधून सदनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षा जवानांनी तिघांना ठार केले. एक दहशतवादी गेट क्रमांक 5 च्या दिशेने धावला तेव्हा सुरक्षा जवानांनी त्याला गोळ्या घातल्या. ही चकमक साडेचार तास सुरू होती.यथावकाश सुरक्षा जवानांनी पाचही दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली होती.

नंतर दिल्ली पोलिसांनी या दहशतवादी हल्ल्याचा तपास केला आणि हा हल्लाआणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केल्याचे निष्पन्न झाले. या हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला त्याचे साथीदार एसएआर गिलानी, अफशान गुरू आणि शौकत हुसेन यांच्यासह अटक करण्यात आली.

काही काळाने झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने गिलानी आणि अफशानची निर्दोष मुक्तता केली, तर अफजल गुरूला फाशीची शिक्षा सुनावली. शौकत हुसेनची फाशीची शिक्षा 10 वर्षांच्या तुरुंगवासात कमी करण्यात आली आणि 9 फेब्रुवारी 2013 रोजी अफजल गुरूला दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली.

Tags: pm modisansad attackterrorist attackTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update
राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.