Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home राष्ट्रीय

संसद परिसर धक्काबुक्की: भाजपकडून आणि काँग्रेसकडून एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 20, 2024, 01:31 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

काल संसदेबाहेर झालेल्या धक्काबुक्कीनंतर भाजपच्या दोन खासदारांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधींमुळे दुखापत झाल्याचा आरोप भाजपने केले आहेत .राहुल यांनी हा आरोप फेटाळून लावला असला तरी भाजपने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे . त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे आहे. भारतीय न्याय संहितेच्या नव्या फौजदारी कायद्यातील काही गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील भाजपने तक्रारीत केली आहे. राहुल यांनी जाणूनबुजून खासदारांना धक्का दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्यासह अन्य काही खासदारांनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये आणखी पाच कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामध्ये कलम 115 (जाणूनबुजून दुखापत करणे), कलम 117 (जाणूनबुजून गंभीर दुखापत करणे), कलम 121 (सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या कर्तव्यापासून विचलित करण्यासाठी दुखापत करणे), कलम 351 (धमकावणे) आणि कलम 125 (दुसऱ्यांची सुरक्षा धोक्यात टाकणे) या कलमांचा समावेश आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडूनही भाजप खासदारांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भाजप खासदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच भाजप खासदारांच्या हातात काठ्या होत्या, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात चळवळ उभी करणार असल्याचे खर्गे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

काय आहे पार्श्वभूमी

संसद भवन परिसरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत भाजप खासदार मुकेश राजपूत आणि प्रतापचंद्र सारंगी जखमी झाले आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्का दिल्यामुळे राजपूत यांचा तोल जाऊन ते अंगावर पडल्यामुळे राजपूत आणि सारंगी दोघेही जखमी झाल्याची घटना काल गुरुवारी सकाळी घडली होती.

या घटनेत प्रतापचंद्र सारंगी यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या डोक्यातून रक्त निघाल्याचे प्रत्यक्षदर्शी खासदाराने सांगितले. दरम्यान पंजाबच्या फरूखाबादचे खासदार मुकेश राजपूत देखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुकेश राजपूत यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेय. तर खासदार प्रतापचंद्र सारंगी यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री गिरीराज किशोर यांनी घटनेची निंदा करत कालचा दिवस संसदीय इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान राहुल गांधी हे विरोधी पक्षनेतेपदाच्या लायकीचे नसल्याचे विधान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. एका आदिवासी महिला खासदाराशी त्यांची वागणूक अशोभनीय असल्याची टीकाही चौहान यांनी केली आहे. संसदेच्या मकर दरवाजावर भाजप खासदारांचे आंदोलन सुरू असतानाच ते तिथे आले. एका बाजूने त्यांना जाण्यासाठी जागा असतानाही भाजप खासदारांमध्ये ते घुसल्याचा आरोपही चौहान यांनी केला आहे.

तर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू टीका करत म्हणाले आहेत की, राहुल विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना कुस्ती दाखवायची काय गरज आहे. इतरांना मारण्यासाठी ते कराटे शिकले आहेत का? दरम्यान भाजप खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे.

Tags: bjpcongressKiren Rijijuparliament winter sessionRahul GandhiTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update
राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.