गेल्या अनेक दिवसांपासून एका शो ची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तो म्हणजे ‘इंडियाज गॉट लेटेंट.’ हा शो युटूबर समय रैना याचा आहे. हा शो खास युवकांसाठी बनवण्यात आला असून, अनेक युवक इथं आपली कला दाखवण्यासाठी येतात. या शो मध्ये कोणत्याही कलेची मर्यादा नाही. कोणताही स्पर्धक आपली कोणतीही कला दाखवून परीक्षकांचे मन जिंकून हा शो जिंकू शकतो आणि जो स्पर्धक हा शो जिंकला आहे त्याला भलीमोठी रक्कम देखील दिली जाते.
या शो ला अनेक प्रसिद्ध सेलेब्रेटींनी हजेरी लावली आहे. यामध्ये कॉमेडीन भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, रॅपर बादशाह व रफ्तार सारख्या सेलिब्रेटींनी गेस्ट म्हणून हजेरी लावली आहे. आता या शो ची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतली आहे.
झाले असे की, शेवटच्या भागात या शो मध्ये गेस्ट म्हणून प्रसिद्ध युटूबर रणवीर अलाहाबादिया याने हजेरी लावली होती. रणवीरने एका स्पर्धकाशी बोलताना आक्षेपार्ह विधान केलं ज्यामुळे त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तसंच अनेकजण संताप व्यक्त करत आहेत. आणि कारवाईची मागणी देखील करत आहेत.
#WATCH | Mumbai: On controversy over YouTuber Ranveer Allahbadia's remarks on a show, Maharashtra CM Devendra Fadnavis says, "I have come to know about it. I have not seen it yet. Things have been said and presented in a wrong way. Everyone has freedom of speech but our freedom… pic.twitter.com/yXKcaWJWDD
— ANI (@ANI) February 10, 2025
व्हायरल व्हिडिओमध्ये रणवीर स्पर्धकाला म्हणताना दिसत आहे की, “तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर से** करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल?” यापैकी कोणताही एक पर्याय निवड असं रणवीरने स्पर्धकाला सांगितले. रणवीरच्या प्रश्नावर शो चा होस्ट समय रैना म्हणतो की, हे सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न आहेत. रणवीरचा हाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. रणवीरच्या या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला असून, कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचलं आणि रणवीर अलाहाबादियाच्या या आक्षेपार्ह विधानाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देखील दिली. फडणवीस म्हणाले आहेत की, “मला याबद्दल माहिती मिळाली आहे. मी स्वतः अजून ते पाहिलेलं नाही. पण खूप वाईट पद्धतीने काही गोष्टी म्हटल्या आहेत, असं मला समजलं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. भाषण स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, तेव्हा ते स्वातंत्र्य संपतं आणि असं करणं अजिबात योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत, ते नियम जर कोणी ओलांडत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं काही घडत असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे.” असं फडणवीस यांनी म्हंटल आहे.