Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायदा लागू करण्यास ममतांचा नकार; पण कायदा काय सांगतो?

Renuka Pawar by Renuka Pawar
Apr 11, 2025, 03:38 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

८ एप्रिल २०२५ पासून देशात वक्फ सुधारणा कायदा २०२५ देशभरात लागू झाला आहे. केंद्र सरकारने याबाबत एक अधिसूचना देखील सादर केली आहे. ज्यात देशात वक्फ सुधारणा कायदा लागू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दोन्ही सभागृहांच्या मंजुरीनंतर वक्फ दुरुस्ती विधेयकाला गेल्या आठवड्यात राष्ट्रपतींची मान्यता मिळाली होती. त्यानंतर देशभरात हा कायदा लागू करण्यात आला आहे.

देशात वक्फ दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर मात्र, विरोधकांकडून या कायद्याला विरोध होत आहे. विरोधी पक्षांनी या कायद्याविरोधात न्यायालयात याचिका देखील दाखल केल्या आहेत. याचदरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘वक्फ सुधारणा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू केला जाणार नाही.’ असं वक्तव्य केले आहे . ममतांच्या याच वक्तव्यानंतर मात्र, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संपूर्ण देशात लागू झालेला कायदा कोणत्याही राज्य सरकारकडून नाकारण्यात येऊ शकतो का? याबाबत काय नियम आहे? संविधानात असा काही उल्लखे आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  याचबाबत आपण आजच्या बातमीद्वारे माहिती जाणून घेणार आहोत.

संविधानानुसार, कोणत्याही राज्य सरकारांना संसदेने पास केलेल्या कायदे व केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागते. केंद्राने दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही राज्यांची जबाबदारी आहे, असे संविधानकार म्हणतात. केंद्राच्या कोणत्याही कायद्याचे पालन न करणे हे संविधानाचे अपयश मानले जाते व असे झाल्यास कोणती कारवाई करता येईल याची स्पष्टपणे संविधानात तरतूद आहे. कलम २५६ नुसार, संसदेने मंजूर केलेले कायदे लागू करणे ही राज्य सरकारांची जबाबदारी आहे.

दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या विधानाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या वकील अश्विनी उपाध्याय म्हणाल्या आहेत की, ‘ममता बॅनर्जी यांचं हे फक्त राजकीय वक्तव्य आहे. केंद्राच्या कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारे थांबवू शकत नाहीत.

जर आपण ‘तीन तलाक’ कायद्याचे उदाहरण घेतले तर तो देशभरात लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की ते त्यांच्या राज्यात हा कायदा लागू करू देणार नाहीत, तर त्यांचे विधान स्वीकार्य ठरणार नाही.

जर त्या राज्यात तिहेरी ‘तीन तलाक’ खटला समोर आला व एखादी व्यक्ती त्यासाठी एफआयआर दाखल करायला गेली, तर पोलिस असे सांगून तक्रार नोंदवण्यास नकार देऊ शकत नाहीत की मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की आम्ही हा कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही.’

दरम्यान, संसदेत पास झालेले कायदे व केंद्राने दिलेल्या सूचना राज्य सरकारांना मान्य कराव्या लागतात. त्यांच्याकडे नकार देण्याचा पर्याय नसतो. पण ते सर्वोच्च न्यायालयात या विरोधात तक्रार करू शकतात. जर त्यांना वाटत असेल की, नागरिकांना अशा कायद्यांमुळे त्रास होत आहे, तर ते यासाठी न्यायालयाचे दार ठोठावू शकतात.

राज्य सरकारकडून असा विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जेव्हा देशात CAA (Citizenship Amendment Act) कायदा लागू करण्यात आला तेव्हा देखील पश्चिम बंगाल आणि केरळच्या सरकारांनी त्यांच्या राज्यात हा कायदा लागू करण्यास विरोध केला होता.

Tags: central governmentMamta BanerjeeTOP NEWSWaqf Amendment Actwest bengal
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update
राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.