जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी थांबण्याचं नाव घेत नाहीये. येत्या दिवसात घुसखोरांची संख्या वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जवान डोळ्यात तेल घालून सीमेची रक्षा करत आहेत. मात्र, घुसखोरांविरुद्ध झालेल्या एका कारवाईत भारतीय जवानाला आपले जीवन अर्पित करावे लागले आहे. घुसखोरांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या एका लष्करी जवानाने रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
शुक्रवारी उशिरा रात्री देखील सीमेपलीकडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भारतीय जवान आधीपासूनच सतर्क असल्याने पाकिस्तानचा डाव हाणून पाडण्यात आला. भारतीय लष्कराने घुसखोरांना अखनूर सेक्टरमधील केरी बट्टल भागात पकडले. यावेळी दहशदवादी आणि लष्करांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवान जखमी झाला त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले पण तिथे त्याने प्राण सोडले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘केरी बट्टल परिसराला पूर्णपणे वेढा घालण्यात आला होता. आणि दहशदवाद्यांना पकडण्यात आले.
Op Chhatru
Based on specific #intelligence, a joint search and destroy #operation along with @JmuKmrPolice was launched on 09 Apr in #Chhatru forest #Kishtwar.
Contact was established late evening on the same day. The #terrorists were effectively engaged and firefight ensued.… pic.twitter.com/QqTwQzoQE3— White Knight Corps (@Whiteknight_IA) April 11, 2025
दुसरीकडे किश्तवारच्या चतरू भागात देखील जवान आणि घुसखोरांमध्ये चकमक झाली. भारतीय लष्कराच्या १६ व्या लष्करी गटाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंबंधित माहिती येत सांगितले की, “खराब हवामान असूनही किश्तवारच्या चतरू भागात सुरू असलेल्या कारवाईत लष्कराने आणखी दोन पाकिस्तानी घुसखोरांना ठार मारले आहे. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात युद्ध देखील साहित्य जप्त करण्यात आले आहेत, ज्यामध्ये एक एके रायफल आणि एम४ रायफलचा समावेश आहे.”
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरीच्या वाढत्या धोक्यामुळे, भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा दलांनी या भागात सुरक्षा वाढवली आहे.